Posts

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

Image
लेडीज फस्ट मग ‘ आई शेवटी का जेवते ’ ? प्रश्न सरळ आणि साधा आहे ,  आपल्या अवती भोवती असे अनेक प्रश्न आपल्याला कदाचित माहित नसतात ,  कदाचित ते आपल्या जवळ असूनही आपण त्या गोष्टीपर्यंत पोहचत नाहीत .  पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे आई .  आईविना जीवन व्यर्थ आहे .  जगातली सर्व ताकद एकीकडे व फक्त एकटी आई एकीकडे अशी ही आईची व्याख्या आहे .  म्हणतात ना आकशाचा कागद आणि समुद्राची शाई जरी केली तरी आईविषयी निबंध लिहिला जाऊ शकणार नाही कारण ते सुध्दा कमी पडेल . " स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी "  हे अगदी तंतोतंत खरं आहे .  ज्याच्याजवळ आई नाही त्याला विचारा आई खरंच काय असते .  आईची व्याख्या इतक्या सहज कोणीच करु शकत नाही .  देवाला प्रत्येकाडं वेळ देणं होत नाही त्यामुळं त्या परमेश्वरांन आईच्या रुपात आपल्यावर माया करत आहे .  आई वडीलांएवढं प्रेम जगाच्या पाठीवर कोणीच करु शकत नाही .  स्त्रीमध्ये नवनिर्माण करण्याची क्षमता असते .  तिच्यामध्ये असणारी सकरात्मक उर्जा परिवर्तन करण्याची हिम्मत असते .  प्रत्येक स्त्री कोणाची तरी आई ,  बहिण ,  पत्नी ,  मुलगी असते .  आईएवढं महान व्यक्तीमत्व जगात कोणीच नाही . 

स्वत:ला आवडले तसं जगा, कारण आयुष्यात वन्समोर नाही !

Image
  स्वत:ला आवडले तसं जगा, कारण आयुष्यात वन्समोर नाही ! तुम्ही स्वत:शी प्रामाणिक राहीलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्याचा नक्कीच फायदा होईल यात शंक्काच नाही. स्वत:साठी आयुष्य जगायला कसलीही हरकत नाही. अतियश स्वत:चसाठी जगलात तर त्यात तुम्ही कसल्याही प्रकारचे दोषी नसाल किंवा त्याची खंत अजिबात करत बसण्याची आवश्यकता नाही. स्वत:ला आवडेल तसंच जगायला पाहिजे. जन्म मृत्यूच्या साखळीप्रमाणे जन्म तिथे मृत्यू आहेच. मृत्यू हा लॉस नसून तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदपूर्ण आयुष्य जगला नाहीत, मानासारखं जगला नाहीत तर तुम्ही आयुष्यच जगला नाहीत याचा अर्थ जवळजवळ असाच होतो. आयुष्य जगण्यासाठी तुमच्या चेहऱ्यावर सदासुख, हसतमुखपणा किती आहे त्यावर ठरतं की तुम्ही तुमचं आयुष्य किती आनंदी व सुखमय जगता. मरावे परि किर्तीरुपी उरावे असं म्हणतात हे पण तितकंच खरं आहे, परंतू स्वत:च्या आयुष्याची माती करुन नव्हे. सोशल मिडीयावर दररोज खुप सुविचार पोस्ट होत असतात, परंतू त्याचा वापर कुठे व केव्हा व्हावा असं ज्याला कळलं त्यालाच आयुष्य कळलं. आपण स्वत: व आपला परिवार अगोदर व नंतर बाकी समाज असा विचार हा मर्यादीत असून तुटपुंजा वाटत असला

ऑटोमेशन इंजिनियर बालाजी शेषेराव चव्हाण या तरुणाचा "नांदगाव ते जर्मनी" संघर्षमय प्रवास

Image
  नांदगाव हे अंबाजोगाई तालुक्यातलं छोटसं खेडंगाव, खरं पाहिलं तर या तरुणाची ही एक विलक्षण यशोगाथा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण ऑटोमेशन इंजिनियर बालाजी शेषेराव चव्हाण या तरुणाचा प्रवास संघर्षमय आहेच तेवढा. जीवनाच्या वाटेवर समस्यांचा सामना करत कठीण परिस्थितीवर मात करुन यशाचं शिखर गाठून त्यानं यशाला गवसणी घातली आहे. कारण केल्याने होत आहे रे आधि केलेची पाहिजे असं ब्रीदवाक्य आहे. यश मिळवण्यासाठी कसल्याही प्रकारचा शॉर्टकट पर्याय नसतो याचं ज्ञान बालाजी या तरुण अभियंत्याला ज्ञात होतं. त्यामुळं अगदी लहानपणापासूनच त्याची चिकाटी व जिद्दी स्वभाव असल्यामुळं एखादं काम हाती घेतलं की तो ते काम पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नसे. कष्ट हेच भांडवल असतं या तत्वाला धरुन आयुष्यात पुढं वाटचाल करावी लागते याचं भान बालाजी या तरुणाला होतं. विदेशात जाण्याचं स्वप्न प्रत्येक तरुण तरुणींचं असतं पण ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तेव्हा कुठं ते स्वप्न प्रत्यक्षात साकार होतं, ते बालाजीनं आज पूर्ण केलं आहे याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे व तेवढाच त्यानं मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचा सर्

एक व्हिडीओ कॉल आणि बँक खाते रिकामे झाल्यावर व्हाल बेहाल …

Image
एक व्हिडीओ कॉल आणि बँक खाते रिकामे झाल्यावर व्हाल बेहाल … दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारी मोठया प्रमाणत वाढत आहे. सायबर सेलच्या आवाक्याबाहेर सायबर गुन्हेगारी जाईल की काय अशी भिती वाटत आहे. जसं आयटी क्षेत्रात दररोज विविध शोध लागत आहेत व आयटी क्षेत्रामुळे मानवाच्या दैनंदिन जीवनात क्रांती झाली तसंच सायबर गुन्हेगारी क्षेत्रातही आयटी क्षेत्राप्रमाणेच नवनवीन तंत्राज्ञानाचा वापर करुन जणू सायबर गुन्हेगारी प्रगतीपथावरच आहे असं वाटत आहे. सायबर गुन्हेगारांनी मात्र नेहमीच अटकेपार झेंडे लावून सर्वसामान्यांची आर्थिक लूट आजवर केली आहे. कधी बँक खाते रिकामे करतात, तर कधी फोन करुन एटीएम क्रमांक मागून ओटीपीद्वारे बँक खात्यामधील पैसे गायब करतात, तर कधी क्रेटीड कार्डवरुन शॉपींग करतात, तर कधी मॉलध्ये जाऊन डेबीड कार्डवरुन शॉपींग करतात, तर कधी युपीआय ॲपच्यामाध्यमातून कोड स्कॅनर पाठवून आर्थिक लुट करतात, तर कधी गुगल पे, फोन पे किंवा इतर वॉलेटवर रिक्वेस्ट पाठवून डल्ला मारतांनाचे प्रकार आपण नेहमीच पाहिले आहेत. आता हे सर्व चोरीचे प्रकार आपण आपल्या दैनंदिन जीवनशैली मध्ये ॲडजस्ट केले आहे आणि आपण दुसरं करु तरी काय शकतो

अै बाप पोरगं संभाळ ! शेंबडं खूनं करायलंय …

Image
  अै बाप पोरगं संभाळ ! शेंबडं खूनं करायलंय … सध्या देशाची मानसिक स्थिती अशी झाली आहे की ,  ट्रेंडच्या नावाखाली काहीही खपवलं जात आहे .  काहीतरी नवीन कुरापती करायच्या व त्याला नवीन ट्रेंड आला म्हणून आपण साऱ्यांनी अशा बाबींना अगदी डोक्यावर घ्यायाचं .   ट्रेंडींगच्या नावाखाली मग तो देशाचा ,  धर्माचा अपमान का असेना .  देशप्रेम नाही ,  धर्मप्रेम नाही ,  आदर सन्मान नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कायद्याचा धाक मुळीच नाही .  ट्रेंडींच्या नावाखाली या ट्रेंडवाल्यांनी कायद्याच्या चौकटी मोडून त्याच्या शेकोट्या केंव्हाच केल्यात आणि शेकोटया करुन त्याची पार राखरांगोळी झाली हे मात्र अद्याप कोणाच्याही लक्षात आलंच नाही .  अलीकडेच एका बारावीत शिकत असलेल्या शेंबडया पोरानं एका  समवयस्क पोराला  साऊथच्या सिनेमाच्या सिनप्रमाणे धारदार कोयत्याने भोसकले .  त्यात त्याचा मृत्यू झाला .  हे सगळे त्या ट्रेंडींग रिलचे व साऊथच्या सिनेमांमधील विकृत दृष्यांचे दुष्परीणाम आहेत यात शंक्काच नाही .  ट्रेंडच्या नावाखाली काही महिला व मुलींनी रिल तयार करुन त्यावर अश्लिल वर्तन करुन व्हीडीओ तयार करुन साेशल मिडीयावर त्याचा प्रसार क

हसवणारा पाहिजेच ...

Image
तणावमुक्त आयुष्य जगायचं असेल तर जीवनात आनंदमय क्षण खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. तुम्ही पैशाने कितीही श्रीमंत असाल पण आनंद कधीही पैशाने विकत घेऊ शकणार नाहीत. आनंद होणं हे एक नैसर्गिक वरदान आहे. आनंद हा मानवी आयुष्यातला अनमोल रत्न आहे. म्हणूनच प्रत्येकाच्या कुटूंबामध्ये एक तरी हसवणारा व्यक्ती पाहिजेच कारण हा आयुष्याचा महत्त्वाचा व अनमोल भाग आहे. तुम्ही एखादा दिवस उदास झालात तर त्या क्षणी तुम्हाला तेंव्हा सहानुभूतीची व आधाराची अत्यंत आवश्यता असते. त्या क्षणी जर तुम्हाला हसवणारा व आनंद देणारा कोणी भोटला तर तो तुमचा दु:खाचा क्षण क्षणार्धात आनंदाचा नक्कीच करेल. एरवी आपण मनोरंजनाचा भाग म्हणून विनोदी चित्रपट विनोद, विनोदी कथा, विनोदी नाटकं, चित्रपटंव विनोदी कार्यक्रम पाहतो कारण त्याची आपल्याला का गरज आहे आणि हे जर जाणून घ्यायचा असेल तर त्या हसवणार्‍या व्यक्तीला जाऊन विचारा हसवण्यासाठी किती मेहनत व कष्ट लागतात. समाजात सामाजिक कार्य करण्यासाठी खूप मोलाचे योगदान द्यावं लागतं स्वतःला खूप झिजवावं लागतं, प्रचंड मेहनतीच्या जोरावर समाजसेवा सफल होते व श्रेष्ठ ठरते. इतरांना हसण्यासाठी हसवणार्‍या व्यक्त

कंट्रोल झेड इज नेव्हर इन आवर लाईफ ...

Image
  कंट्रोल झेड ही क्रिया संगणकाशी निगडीत आहे. त्यामुळं ती समजून घेणं महत्वाचं आहे. कंट्रोल झेड ही एक कॉम्प्युटरवर दैनंदिन कामकाज करतांना वापरली  जाणारी शॉर्टकट की आहे अर्थात काम करत असतांना एखादी क्रिया आपल्याला नको असेल किंवा एखादी झालेली चूक, क्रिया पूर्ववत करण्यासाठी या कीज चा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे संगणकावर केलेल्या कामात अचूकता येते. ही की, Undo या सुवीधेचे संक्षिप्त रुप आहे. तुम्ही कधीही जीवघेण्यास स्पर्धेच्या युगात अशा चुका करु नका की, त्याला Undo हे ऑप्शन अर्थात कंट्रोल झेड नसणार आहे. आयुष्याच्या पायर्‍या चढत असतांना कधीही मागे वळुन पाहू नका. इतिहासाच्या अभ्यास करतांना मागे वळुन जरुर पहा कारण आयुष्याच्या पायर्‍या ह्या जोपर्यंत यश संपादन होत नाही तोपर्यंत चढयच्याच असतात व इतिहासाचा अभ्यास करतांना अनुभवाच्या जोरावर आपलं जीवन जगायला शिकायचं असतं. प्रत्येकजण आयुष्यामध्ये रोज नवनवीन गोष्टी शिकत असतो. अर्थात माणूस आयुष्यभर काही ना काही शिकतच असतो, व्यक्ती हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो. पण हे सर्व काही होणं जीवनात एकदाच असणार आहे. जसं निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाह

‘घरबसल्या कमवा’ चं पेटलं रानं, अन् सोशल मिडीयावर उधाणं आलंया तुमच्या खिशाला कात्री लावाया, चोरटं आलंया !

Image
कोरोना काळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, बेरोजगार झालेल्या तरुण वर्गाला आता काहीतरी कामधंदा करणं गरजेचं आहे, त्यामुळं प्रत्येकजण नोकरीसाठी शोधमोहीम सुरु करतो. उदरनिर्वाह करण्यासाठी काही नाही काही पावलं उचलायला हवीतच. त्यामुळंच अनेकांचा कल हा आपल्याला पटकन कुठंतरी काम मिळेल अशी आशा बाळगुन असतो व ताबडतोब स्मार्टफोनच्या माध्यमातून नोकरीच्या शोधासाठी ऑनलाईन शोधमोहिम सुरु करतो. एरवी तरुण वर्ग घरबसल्या काही ना काही पार्ट टाईम जॉब मिळवण्याच्या धडपडीत नेहमीच असतो. ऑनलाईन नोकरी मिळवण्यासाठी किंवा घरबसल्या प्रत्येकजण काही तरी काम मिळवून त्यातून पैसा कमवण्याचा अनेकांचा त्याकडे ओघ तर असतोच शिवाय त्याप्रमाणे प्रयत्नशिलही असतो. एक्ट्रा इनकम कोणाला नको आहे, प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं आहे. त्यामुळे पैसा जेवढा जास्त कमवता येईल तेवढा कमवावा असा सर्वांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. ऑनलाईन शोधमोहिम सुरु केल्यानंतर अनेक सोशल मिडीयावर अनेक फसव्या जाहिराती असतात व काही खर्‍या जाहिराती असतात. आता हया खर्‍या आणि फसव्या कशा ओळखायच्या हा सर्वांसमोर खुप मोठा पेच आहे. सोशल मिडीयावर ऑनलाईन पैशांवर डल्ला मारणारी टोळी न

जन्मतः कोणीही गुन्हेगार नसतो ...

Image
  एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला की, मानसिक विचारांमुळे त्याचे विचारपरिवर्तन होते व माणूस गुन्हेगारी क्षेत्राकडे आपोआप खेचला जातो. विनाकारण एखाद्या व्यक्तीला जर त्रास झाला तर तो आपोआपच गुन्हेगार बनला जातो. समाजामध्ये काही विकृत विचारांची धारणा असलेले लोक असतात त्यांच्या हातून गुन्हा घडतो व ते स्वत: गुन्हा करतात तेव्हा त्यांनी गुन्हेगारी करून आपली उपजीविका उदरनिर्वाह करण्याचे स्वतः ठरवलेले असते. अशा प्रकारचे गुन्हेगार हे वेगळ्या स्वरूपाचे असतात त्यामुळे विनाकारण अन्याय झालेल्या गुन्हेगार व स्वतःहून गुन्हेगारी क्षेत्राकडे गेलेल्या गुन्हेगारांमध्ये फरक आहे. आपण जेव्हा एखादी कृती करतो तेव्हा त्यापासून इतर कोणाचे नुकसान तर होत नाही ना असा विचार केला पाहिजे कारण हासुद्धा भाग अनेकांना गुन्हेगारी क्षेत्राकडे जाण्यापासून वाचवू शकतो. त्यामुळे आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये अतिशय प्रामाणिकपणे आपले कर्तव्य केले तर आपल्यामुळे एखाद्यावर अन्याय झाला नाही तर आपले जीवन सार्थकी झाले असे समजावे. नाण्याच्या दोन बाजू असतात एक चांगली आणि एक वाईट. आपलं काम नाण्याच्या कोणत्या बाजूने चालायचं

बलात्कारांचा कहरच कहर ...

Image
आज दोन घटना समोर आल्या, एक मुंबईत बलात्कार झाला आणि दुसरीकडे पुण्यात अल्पवयीन मुलीवर दोन बलात्काराच्या घटना घडल्या या बालात्काराच्या घटना अतिशय भयंकर होत्या. सदर घटना माणुसकीला काळीमा फ ासणार्‍या आहेत. अमानुषपणे केले जाणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत. पुण्यामध्ये एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केले या घटनेचा विसर पडला नाही तोवरच दुसरी बलात्काराची धक्कादायक घटना घडते. हे किती दुर्देव आहे. नराधमांनी सहा वर्षाच्य चिमुकलीवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना पुण्यामध्ये घडली. पुण्यात रेल्वे स्टेशनच्या फुटपाथवर झोपलेल्या आईच्या कुशीतून उचलून नेवून तिच्यावर सामुहीक अत्याचार झाला. मुंबईमध्ये तर याहीपेक्षा विचित्र व धक्कादायक प्रकार घडला. ही अतिशय निंदनीय घटना आहे. एका तीस वर्षीय पीडीतेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगामध्ये रॉड घुसवला. र्‍ह्दय पिळवटून टाकणारी अशी ही घटना साकीनाका परिसर मुंबई याठिकाणी घडली. राज्यात महिला तर सुरक्षित नाहीतच. बलात्कारांच्या वाढत्या घटनांमुळे राज्यात व देशात वासनांध व व्यसनांध झालेल्या नाराधमांकडून बलात्काांच्या अपराधाचे सत्र  कमी होतांना दिसून येत नाही. माणुसकीला