Posts

Showing posts from January, 2018

मुक्या झाडांना ‘तोंडे’ भेटले ; वाळलेल्या खोडांना ‘अंकुर’ फुटले

Image
मुक्या झाडांना ‘तोंडे’ भेटले ; वाळलेल्या खोडांना ‘अंकुर’ फुटले आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार विजेते संपादक बालाजी तोंडे यांच्या कार्याला बीड जिल्हयातील नव्हे तर राज्यभरातील जनता सलाम करत आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांनी असं काही काम केलं आहे की प्रत्येकाला आश्चर्याचा सुखद धक्का बसल्याशिवाय रहात नाही. वृक्षवल्ली आम्हा सोयरे आपण म्हणतो, पण याच सोयऱ्यांची कत्तल राज्यभर दिवसा ढवळ्या सुरू आहे. पण याचं दु:ख निसर्गावर निस्वार्थ प्रेम करणारांनाच कळते. झाडाचे रोपटे लावून त्याच्यासोबत सेल्फी काढून प्रसारमाध्यमातून प्रसिध्दी मिळवणारे मोप मिळतील. पण बालाजी तोंडे यांना निसर्गप्रेमी अवलियाच म्हणावं लागेल.  बीड तसेच राज्यभरात महामार्गावरील रस्ता रुंदीकरणासाठी हजारोवर्षे जुन्या वृक्षांची कत्तल होत आहे. शासनदरबारी बालाजी तोंडे यांनी वेळोवेळी ही गोष्ट निदर्शनास आणून दिली आहे. बालाजी तोंडे यांच्या मते अफाट वृक्षतोड झालीच तर प्रत्येकाला पाठीवर आक्सीजनचा सिलेंडर घेवून रत्याने चालावे लागेल. ही वृक्षतोड थांबवण्यासाठी व झाडे लावण्यासाठी बालाजी तोंडे यांचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरू आहेत. मा

कोटयावधी रुपये खर्चूनही भारत शेवटी अस्वच्छच !

Image
कोटयावधी रुपये खर्चूनही भारत शेवटी अस्वच्छच !  स्वच्छ भारत मिशन च्या नावाने भारत सरकारने देश स्वच्छ होण्याचे धडे गिरवण्याचे काम शिपायांपासून ते वर्ग 1 च्या अधिकाऱ्यांपर्यंत दिले व स्वच्छ भारत मिशन ही सक्तीची योजना केली.परंतू शेवटी भारत देश हा अस्वच्छच दिसतोय सर्वत्र. मागील काही महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रातून एक विदेशी जोडप्यांचा फोटो प्रसिध्द झालेला सोशल मिडीयावर पाहितला. तो फोटो बरंच काही आपल्या देशातीत जनतेला शिकवण करुन देणारा होता. त्या फ फोटोमध्ये एका व्यक्तीने सिगारेट ओढल्यानंतर उरलेला तुकडा इतरत्र न टाकता आपल्या बॅगमध्ये टाकला, तेथीलच जवळ असलेल्या भारतीय व्यक्तीने हे कृत्य पहात होता, न राहून त्याने विचारले, असे का केले ? त्या विदेशी पर्यटकाने जे उत्तर दिले खरंच आश्चर्यकारक होते ! देश घाण करण्यात जे जे सहभागी आहेत अर्थात आपण सर्वचजण त्यांनाही लाज वाटेल असेच होते. ते विदेशी पर्यटक म्हणाले, की मी हा कचरा इथे टाकला तर मलाही माझ्या मायदेशी गेल्यावर अशीच सवय लागेल आणि आमच्या देशामध्ये असे कृत्य करणारास भारतीय रक्कमेप्रमाणे जवळपास पंधरा हजार रुपये दंड ठोठावतात. बघा हा देश, याल

ही 'सेल्फी' आणखी किती बळी घेणार ?

Image
ही ' सेल्फी '  आणखी किती बळी घेणार ? तंत्रज्ञान विकसीत झाले, आपला वावर डिजीटल युगात झाला त्यामुळे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला व ज्ञानाची पावर वाढली. कधी काळी रोलचा कॅमेला असायचा, त्यात निगेटीव्ह फि ल्म रोज टाकून तो रोल संपल्यासच फोटो धुवून अर्थात डेव्हलप करुन मिळायचा, फोटो काढणे ही पध्दत दुर्मीळच. मोजक्याच, आवश्यक अशाच कार्यक्रम प्रसंगी क्वचितच ही पध्दत वापरली जायची. कालांतराने दिवसेंदिवस जग प्रगतीकडे जातंय म्हटल्यावर सोयी सुविधा हया सर्वांसाठी उपयुक्त आहेत. मोबाईलयुगाची निर्मिती झाली. फोटो कॅमेऱ्यांच्या सुध्दा जडणघडणीत अमुलाग्र बदल घडून आला, आता पाच हजारांपासून ते पन्नास लाखांपर्यंतचे फोटो काढण्यासाठी विविध रंगाचे अन ढंगाचे कॅमेरे उपलब्ध आहेत. त्यात भर पडली ती मोबाईमध्ये फोटो कॅमेरा आला. हा बदल फोटोग्राफी क्षेत्राला मागे सरकवणारा ठरला व तो यशस्वी झाला. कधी काळी फ ोटो काढायचा म्हटलं तर प्रोफेश्नल कॅमेरामनच फोटो काढायला यायचां. पण आता त्यांची तेवढी गरज उरली नाही, हा बदल व तो मान आता स्मार्ट फोनने हिसकावून घेतला आहे. पण कॅमेऱ्यातील जीवंतपणा व तशी कला आत्ताच्या

हीच का ती समानता ? अन हेच का ते महापुरूषांचे विचार ?

Image
हीच का ती समानता ? अन हेच का ते महापुरूषांचे विचार ? महिलांना चुल अन मुल शिवाय आजच्या युगात फ क्त नावालाच आरक्षण अन संरक्षण आहे. केवळ महिलांना आम्ही पुरूष वर्ग तिला पुरूषासमान वागणुक देतो असं भासवतात. मात्र तिला ना आरक्षण आहे ना संरक्षण, गेल्या कित्येक वर्ष झालं बलात्काराचं प्रमाण देशात काही कमी होता होत नाही. ही कीड निघून जाण्याचं नाव घेत नाही. तेंव्हा आपण महापुरूषांचे व्याख्यानं जनजागृती साठी, परिवर्तनासाठी, क्रांती घडवण्यासाठी, चांगल्या जीवनाचा मार्ग शोधण्यासाठी विचार आत्मसात करतो. परंतु त्यांचे विचार खरंच आत्मसात होवून त्याप्रमाणे आपण स्वत: अनुकरून करतो का ? तर बिलकुलच नाही असे लक्षात येते. स्त्रीयांना समानतेची वागणुक मिळावी यासाठी महापुरूषांनी त्यांच्या साहित्य विचारातून प्रेरणा मिळावी यासाठी जीवाचं रान केलं पण आपणा आजही त्यांच्या त्या विचारांना मान्य करायला तयार नाहीत. क्वचीत एखादा अपवाद वगळता. आजही स्त्रीयांना शिवजयंती (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वगळता) किंवा अन्य जयंती निमित्त मिरवणुक असो वा विविध कार्यक्रम महिलांना घरातच ठेवण्याची प्रथा बहुतेक ठिकाणी चालते.