Posts

Showing posts from June, 2017

मुख्यमंत्री यंदा पांडुरंगाच्या दर्शनाला पायी येणार ? दर्शनही वारकऱ्यांसोबतच घेणार ?

Image
मुख्यमंत्री यंदा पांडुरंगाच्या दर्शनाला पायी येणार ? दर्शनही वारकऱ्यांसोबतच घेणार ? वारकऱ्यांच्या वर्दीत राजकिय गर्दी करावीशी म्हणतो त्याशिवाय परिवर्तनाची सर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. भाग एक मध्ये पांडुरंगाच्या प्रथम दर्शनाच्या व पुजेच्या मानाची प्रथा असावी की नसावी व कोस कोस वारकरी राज्या परराज्यातून दर्शनासाठी येतो व दरवर्षी मुख्यमंत्री मात्र लाल दिव्याच्या गाडीत (यंदा अपवाद) किंवा चार पात्याच्या फडफड करत हेलीकॉप्टरमधून येऊन दर्शनाचा व पुजेचा पहिला मान पटकावतात याविषयी होता. हा मान केव्हापासून दिला जातो ? का दिला जातो ? याचा इतिहास काय ? किंवा ही पुजा मुख्यमंत्री यांच्या हातूनच का ? असे बहुत मार्गी, विचारी व प्रश्नांनाही प्रश्नात टाकणारी काही प्रश्न आहेत, हे सहाजीकच आहे, परंतू याकडे न जाता, साधा आणि सरळ प्रश्न असा आहे की, खरंच यंदा परिवर्तन होईल का ? कोस कोस पायी महिनेच्या महिने पायी दिंडीमध्ये कशाचीही तमा न बाळगता वारकरी विठुरायाच्या दर्शनाला येतो, भक्तीच्या भुकेल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांगेतच उभा राहून बारा बारा वेळ देऊन तास दर्शन घेऊन तृत्प होऊन परतीच्या वाटेवर न

कोस कोस चालतो वारकरी अन विठ्ठलाचे पहिले दर्शन घेतात मुख्यमंत्री ?

Image
कोस कोस चालतो वारकरी अन विठ्ठलाचे पहिले दर्शन घेतात मुख्यमंत्री ? विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक राज्यातून परराज्यातून पायी पंढरपूरकडे जाण्यासाठी कोस कोस दूर पल्ले पार करुन दर्शन घेतो. पंढरपूरला आषाढी एकादशी दिवशी दर्शन मिळावे यासाठी प्रत्येक वारकऱ्याची धडपड पहावयास मिळते. प्रत्येक भाविकाला, प्रत्येक पायी दिंडीमध्ये चालत जावून पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या वारकऱ्याला वाटतं कानडा विठ्ठल माझ्याकडेच पाहतोय. विठ्ठलाचा महिमा सांगत, विठ्ठल विठ्ठल, माउली माउली, टाळ, विणा, मृदंगाच्या गजरात पायी दींडीचे चित्र पहावयास मिळते. दिंडी शहरातून जात असतांना दिंडीकडे नकळत कान गेल्यास विठुरायाचा गजर ऐकू आल्यास अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही. इतके आपणही तल्लीन होतो, ना कोणाती जात ना कोणाता भेद, विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी एकमेव जात असते, एकमेव माणुसकी, एकमेव भाव म्हणजे माउली, एकमेकांना हाक मारतांना सुध्दा नावाने हाक न मारता फ क्त माउली म्हणतात, मग स्त्री, पुरूष किंवा चिमुकली असोत. वारकऱ्यांच्या पालखीमध्ये सर्वस्तरातील, सर्व वयोगटातील माउली असतो, उन, वारा, पावसाची तमा न बाळगता विठुरा

स्वप्नं विदेशात जाण्याचं !

स्वप्नं विदेशात जाण्याचं ! पदवी शिक्षण पूर्ण झाले की युवक नौकरीच्या शोधात असतो, पदवी शिक्षण पूर्ण होता न होता त्याआधीच नौकरी कोठे व कशी मिळवावी याचं प्लॅनिंग तरुण वर्गामध्ये मित्रमैत्रिणींच्या सहवासातून, चर्चासत्रातून चालू असतं. आपल्या भारत देशातील चलन रुपयांमध्ये आहे. त्यापेक्षा विदेशी चलन त्याप्रमाणात आपल्या रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे व विदेशातील महिन्याला मिळाणारा पगार थोडा वाटता तर त्याचं रुपांतर भारतात आल्यानंतर किती तरी पटीने जास्त असल्यामुळे हे पहिलं ं कारण विदेशात जाण्याचं असावं असं तरुणांच्या उत्सुकतेकडं पाहून वाटतं. भारत देश हा गरीब देश असल्यामुळे तरुणांना गरीबीतून शिक्षण घेतल्यामुळे गरीबीची जाण असते. त्यामुळे घरची परिस्थिती बदलण्यासाठी व स्वत: जीवनात काय करायचं अशी विविध स्वप्न बघितल्यामुळे तरुण युवक वर्ग हा नेहमीच स्पर्धेत टिकूण राहण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र सर्वांनाच विदेशात जाण्याची संधी मिळत नाही. भारतातील बऱ्याच तरुणाईमध्ये इंग्रजीचा पाया पक्का नसल्याने व आत्मविश्वास नसल्याने एक प्रकारचे न्यूनगंड तयार झाले आहे. त्यामुळे त्याचा बराचसा फटका त्यांना करिअर करता

लवकर निर्णय घ्या !

लवकर निर्णय घ्या ! शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या करण्यात आपर्यंत किती तरी शेतकऱ्यांच्या म्होरक्यांनी आपले स्वार्थ साधले. आपल्या पोळया भाजून घेतल्या. शेतकरी नेते म्हणून जणू हे शास्त्रज्ञच झाले. पण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात व शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना पूर्ण करणयात या धूर्त शेतकरी नेत्यांना अपयश आले हे मान्य करावेच लागेल शिवाय ही शोकांतीका आपल्या राज्यात असल्याने शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्येच्या वाटेवर जातोय अशा सर्वच नेत्यांना याबाबत गांभिर्य नसल्याचे दिसून येते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गेली कित्येक दिवस अभ्यास करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे मात्र मुख्यमंत्री हे ठोस भूमिका घेण्यास तयार दिसत नसल्याने शेतकरी आता संपावर गेला असल्याने राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त होतांना दिसू लागला आहे. शेतकरी कधीच एवढा आक्रमक झाला नव्हता. आपर्यंत अन्याय व त्रास सहन करत आपला राग गिळून गप्प होता मात्र आता ही बाब सहनशिलतेल्या पलिकडे गेल्याने शेतकरी संप करत आहे. राज्य बंदचे चित्र चालू असतांना या अपयशी सरकारविरोधात एवढी जनता विरोध करत असल्याने या सरकारचे अपयश व निष्क्रीयत सरळ सरळ