Posts

Showing posts from March, 2018

प्रिंट मिडीयाची विश्वासार्हता !

Image
प्रिंट मिडीयाची विश्वासार्हता ! हल्ली प्रिंट मिडयाला टक्कर देण्यासाठी म्हणून का काय सोशल मिडीयाचा जन्म झाला, सोशल मिडयाच्या माध्यमातून घडलेली घटना अगदी तात्काळ जनसामान्यांपर्यंत स्मार्ट फोनच्या माध्यमातून पसरू लागली. अपघाताच्या बातम्या असतील, विविध सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, अगदी मुंज, जावळ, वरात लग्न इत्यादी शुभर्कांपासून निधनांच्या बातम्या अगदी काय ?, कुठे, केंव्हा ? वगैरे वगैरे क्षणांत माहिती मिळू लागली, हल्ली सोशल मिडीया हा प्रत्येकाच्या जीवनाचा भाग बनला आहे. सोशल मिडीयाशिवाय कोणतेही काम करतांना सर्रास वापर होवू लागल्याने, माहितीची देवाण घेवाण, गप्पा, संदेश अशा सर्व लाभदायक गोष्टी सहज शक्य झाल्या, सोशल मिडीया मानवी जीवनात एक वरदान ठरल्यामुळे डिजीटल युगात जणू क्रांतीच झाली, या नव्या तंत्रज्ञानाचा जन्म झाल्यामुळे सर्वच क्षेत्रात कायापालट पहावयास मिळतोय, यामधील काही तंत्रज्ञानाचा वापर हा शैक्षणिक हेतू पोटीसुध्दा होत आहे. ही व अभिमानाची, कौतुकाची व चांगली बाब तर आहेच शिवाय देशाच्या विकासविषयक बदलामध्ये महत्वाची भूमिका बजावणारा घटकही आहे. असे बरेच  फायदे महत्वं, वैशिष्टये सांगता

महाराज, आम्हाला माफ करा ! “छिंदम सुटला” !

Image
महाराज, आम्हाला माफ करा ! “ छिंदम सुटला ” !   खरंच राजे जमलं तर आम्हाला माफ करा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर सत्ता मिळवणाऱ्या मुजोर भाजप सत्तेतल्या पिलावळांनी राज्यभरामध्ये हैदोस मांडून ठेवला आहे, ज्या राजानं स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपला आयुष्य पणाला लावलं, त्या राजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्याची हिंम्मत करणाऱ्या औलादी राज्यात पैदा होतील असे स्वप्नातही कधी आलं नव्हतं, पण त्याच मातीमध्ये असली किडकी औलाद जन्मला आली व ती आज सुटली यापेक्षा दुसरे कोणतेच दुःख शिवप्रेमी झाले नाही, आजपर्यंत कायदा, सुव्यवस्थेवर, न्यायालयावर शिवप्रेमींचा विश्वास होता. हाच विश्वास आता इतिहासजमा झाला आहे. याचे चिंतन व्यवस्थेला करावेच लागेल. असल्या श्रीपाद छिंदम सारख्या नालायक औलादी हजार पाचशेच्या चिरीमिरी वर व्यवस्थेला नोटांची बंडले दाखवून मोकाट सुटत असतील, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यांमध्ये अशा निंदनीय घटना पुन्हा पुन्हा घडतच राहतील, छत्रपती शिवरायांनी दिलेल्या बलीदानाला हे प्रशासन, हे शासन हे हाफ चड्डी वाल्यांचं सरकार न्याय देऊ शकत नाही, हे फार मोठे दुर्दैवं आहे, फेब्रुवारी महिन्