Posts

Showing posts from 2017

पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ...

Image
पुढारी बोलीव वजन वाढतंया ! ... हल्ली पुढारी, नेते मंडळी, मंत्री-संत्री ह्या कोणत्याही शुभकार्यासाठी, उदघाटन समारंभासाठी, लग्न, मुंज वा इतर कोणात्याही कार्यक्रमासाठी बोलावण्याची प्रथा पुरोगामी महाराष्ट्रात आजवर चालत आली व चालवली आपणच, गर्दी असल्याशिवाय कार्यक्रम शोभून दिसत नाही. त्यासाठी पुढारी असल्याशिवाय गर्दी जमत नाही हे समिकरण यशस्वी झाल्यामुळे जवळपास प्रत्येकजण कार्यक्रम वा समारंभासाठी आषर्कण म्हणून शक्यतो नावाजलेला, गाजलेला थोडकयात इंप्रेशन पाडणारा पुढारीच बोलावतो. ही नेते मंडळी, मंत्री यांना जनतेने ज्या कामासाठी निवडुन दिलेलं असतं, ती कामं प्रत्येकजण बाजूला सारुन त्याला वेळ न देता प्रसिध्दीच्या हावेपोटी अशा कामांना वेळ जास्तीचा देतात. त्यामुळे विकासाच्या कामांना आपोआप पूर्णविराम मिळतोच. शिवाय जनतेनी त्यांच्या मागंपुढं करावं असा ङ्कपणङ्ख त्यांनी केलेलाच असतो. असंच काही एका अमूक अमूक गावात एका अमूक अमूक इमारतीचं उदघाटन करायचं होतं. गण्या आता त्या गावचा जणू म्होरक्याच समाजा, हया म्होरक्याच्या गावात एक इमारत कईक महिन्यांपासून लोकापर्णन करायचं काय ते पेंन्डींग ऱ्हायलं हुतं. त्या

वाघीणीचं दुध ! ...

Image
वाघीणीचं दुध ! ... भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की, शिक्षण हे वाघीणीचं दुध आहे ते पिल्यास प्रत्येकजण गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि ते खरंच आहे. ज्ञानामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे की, माहितीच्या आधारे शिक्षण घेणारे त्या त्या क्षेत्रामध्ये आपली शिखरं गाठतातच. क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फु ले यांनी व क्रांतीज्योती सावित्रीमाईंनी आपल्या सर्वांसाठी शिक्षणाची दारं उघडी करुन दिली. शिक्षणाचं महत्वं आपल्याला त्यांनी सांगितलं व शिक्षण घेण्यास प्रवृत्त केलं हे त्यांचं योगदान, त्यांनी केलेला त्याग हे सर्व आपण लक्षात घेतलं पहिजे, समजून घेतलं पाहिजे, त्यांची जाणीव ठेवली पाहिजे. शिक्षण व्यवस्था ही जशी असायला पाहिजे तशी आपल्याला मिळते का ? आपण घेत असलेलं शिक्षण हे त्या व्यवस्थेतलं आहे का? आपण काय शिकलो ? त्याची गुणवत्ता तेवढी आहे का ? जेवढी आपल्याला शिक्षण घेतल्यानंतर गुरगुरायचं आहे म्हणजेच आपल्याला आपली शिखरं गाठायची आहेत. हल्ली तर शिक्षण पध्दतीचा बाजार मांडून ठेवलाय. शिक्षणव्यवस्था ही पार कोलमडली असून त्याचं बाजारी करण झालंय. आपल्या पाल्याला भ

तरुणांना रोजगार हवाय ! ...

Image
तरुणांना रोजगार हवाय ! ... देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे ही सामाजिक जबाबदारी असते. देशात रोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध असतील तर तरुणांवर आधारित देशाच्या भावी वाटचालीसाठी सर्वच दृष्टीने महत्वाची बाब आहे. देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत असतांना त्यात आपल्या देशाला बेरोजगारीची कीड लागली असल्याचे समजते. तरुणांमध्ये शिक्षण उच्च दर्जाचे असावे याकडे जास्तीचा कल असल्यामुळे या देशात गरीबातला गरीब सुध्दा अत्यंत चांगल्या दर्जाचे शिक्षण घेवून नौकरी मिळवण्यासाठी त्याच्यासह संपूर्ण परिवार धडपड करत आहे. पण देशात सरकार कोणाचेही असो तरुणांना फ क्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनाचे लाल गाजर आत्तापर्यंत दाखवण्यात आले आहे. खाजगी नौकरी क्षेत्रामध्ये नौकरीची हमी अत्यंत अल्प प्रमाणात असल्यामुळे खाजगी नौकरी करणं पुढील वाटचालीसाठी हवं तेवढं परिणामकारक ठरत नाही. त्यात सरकारी नौकरीमध्ये कपात करण्याचा फ तवा सत्ताधाऱ्यांनी काढल्यामुळे तरुणांमध्ये नाराजीचा सुर वाढला आहे. तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी होणारा अवाढव्य खर्च लक्षात घेता नौकऱ्यांचे प्रमाण व मिळणारा पगार

चला पत्रकारितेवर बोलू काही ! ...

Image
चला पत्रकारितेवर बोलू काही ! ... रात्रीचा दिवस करून समाज हितासाठी जनतेची सेवा करण्यासाठी, एक पाऊल जनतेच्या हितासाठी, आपल्या धारदार लेखणीने प्रहार करून अन्यायाला वाचा ङ्गोडणारा झुंजार पत्रकार, निर्भिड पत्रकार, खरतर पत्रकारितेची व्याख्या काही वेगळीच आहे १००% पारदर्शक स्वच्छ पाण्याप्रमाणे त्याचा स्वभाव, प्रत्येक घटकाला समान न्याय आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजासमोर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आरशाप्रमाणे सर्व बाजूंनी कायद्याच्या चौकटीत राहून तारेवरच्या कसरती प्रमाणे काम करावे लागते. पत्रकार हा दिवस पहात नाही, रात्र पाहत नाही, काट्याकुट्यांचा रस्ता पाहत नाही, संकटांना तोंड देत देत समाजाला न्याय देण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य देऊन समाजासमोर सत्य ठेवतो. या सत्यासाठी या पत्रकाराला कसा संघर्ष करावा लागतो याचा विचार कोणीच करत नाही ? पत्रकारांचा संघर्ष म्हणजे वंचित घटकांसाठी, समाजात होणार्‍या अन्यायाला वाचा ङ्गोडण्यासाठी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राजकारणातील, समाजकारणातील दोन्ही बाजू जनतेचे प्रश्‍न त्यांच्यापुढे ठेवण्यासाठी अथक संघर्ष करावा लागतो. पत्रकार बांधवांना काय सम

राज्यात अपघातांचे प्रमाण काही कमी होता होईना ! ...

Image
राज्यात अपघातांचे प्रमाण काही कमी होता होईना ! ... महाराष्ट्र राज्यामध्ये अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. या गंभीर विषयाला राज्य मंत्रिमंडळामध्ये व शासन दरबारी वाचा फोडायला कोणीच तयार होताना दिसत नाही. दिवसेंदिवस होणाऱ्या अपघातांमध्ये सर्वसामान्य जनता, निर्दोष बालके यांची हत्याकांडं आपल्याला पाहावयास मिळत आहेत. या अपघातांवर तोडगा काढायचा कधी ? असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आहे. अपघात कशामुळे होतात ? त्याची कारणं काय आहेत ? या विषयाकडे जरा स्वतःचा प्रश्न असल्याप्रमाणे पाहिल्यास तोडगा नक्कीच निघेल व अपघातांचे प्रमाण आपोआप कमी होण्यास नक्कीच मदत होईल यात तिळमात्र शंका नाही.  राज्याचे परिवहन मंत्री आश्वासनांचं नेहमीच गाजर देतात. त्यांना कोणी फोन केल्यास ते सांगतात अपघात कमी करण्यासाठी आम्ही आमचे वतीने सर्व प्रयत्न करत आहोत असे बोलण्यात येते, त्यात वाहतूक प्रशासन हेसुद्धा तेवढेच जबाबदार आहे. हल्ली तर राज्य परिवहन मंडळाच्या बस यांच्या अपघाताचा आलेख उच्च स्तरावर आहे. बसचा अपघात होण्याची कारणे पाहिली असता सध्याचे बस चालक हे तरुण वयातील असल्यामुळे भरधाव बस चालवणे, ओव्हरटेक करणे

माणुसकी हरवलेला माणुस ...

Image
माणुसकी हरवलेला माणुस ... माणसाच्या शरीराचा विचार केल्यास त्याच्या शरीराला चालना देणारा मेंदू हा सर्व प्रक्रियांना जबाबदार असतो . त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची नियंत्रण व्यवस्था ही मेंदूद्वारे चालते . समाजामध्ये वावरत असतांना या मेंदूचा कोणत्या ना कोणत्या घटकाची संबंध येतोच . या मेंदूचे लक्ष सकारात्मक व नकारात्मक आहे हे कळते . काहीसं माणुसकीचा माणुसकीच्या शब्दांमध्ये बेरीज - वजाबाकी होतेच , परंतु माणूस या मेंदूचा उपयोग निगेटिव चालना देण्यासाठी जास्त वापरतो . या निगेटिव पावरचा समाजामध्ये विपरीत परिणाम होणारच . स्वतःचे अस्तित्व टिकवायचं की घालवायचं हे या मेंदूवर अवलंबून असते . आपल्याकडे या मेंदूचाच फारसा प्रमाणामध्ये दूरुपयोग होताना दिसतोय . आपल्या देशाची संरक्षण व्यवस्था ही काही प्रमाणात या मेंदूसारखे काम करत असते . अर्थात पोलिस यंत्रणा . मला पोलिस यंत्रणेच्या चांगल्या कामाबद्दल बोलायचे असल्यास नक्की अभिमान वाटेल पण नकारात्मक गोष्टींचा लेखाजोखा जर पाहिला तर शरमेनं मान