साहेब ! मी शेतकरी बोलतोय … साहेब ! मी शेतकरी बोलतोय … रोज रोज शेतात राब राब राबतोय कितीही मेहनत घेतली तरी पोटाला आर्धीच खातोय वाटलं होतं ऐकेल कोणी माझी हाक होईल कोणी माझ्या आयुष्याच्या प्रगतीचं चाक पण मला आजवर सगळयांनी दिला ठेंग्याचा हात माझ्याविषयी सगळयांच्या मनात पापच पाप पोटभर खाऊन ढेकर देता तुम्ही शिळया तुकडयावरच दिवस काढतो आम्ही असाच संसाराचा गाढा हजारो वर्षे ओढतोय साहेब ! मी शेतकरी बोलतोय … दुष्काळ आला, त्याला पाहुणा समजुन पाहुणचार केला सावकार आला, त्याचाही खिसा भरता केला अजुनही बँकाची कर्ज फेडतोय साहेब ! मी शेतकरी बोलतोय … एसीत बसुन आमच्यासाठी संघर्षाचं नका घेऊ सोंग संघर्ष तर आम्ही करतोय, नका करु तुम्ही नुसतंच ढोंग दुपारचा सुर्य डोक्यावर घ्या मग कळेल तुम्हाला आम्ही कसे कष्ट करतोय साहेब ! मी शेतकरी बोलतोय … मंत्रालयात बसुन फक्तं बोलनं असतं लई सोप्पं कितीही खोटी आश्वासनं दिले तरीही आम्ही आजवर गप्पं आम्ही काय गुन्हा केला तुमच्याकडं नाही पैका आमच्यासाठी एकतरी आयोग लागू करा, एवढं तुम्ही ऐका पोराच्या शिक्षणापाई आज सुध्दा मी आनव
आई माझी मायेचा सागर … या विश्वात असं एकच न्यायालय आहे जिथं सर्व गुन्हे माफ होतात ती म्हणजे आई. आई म्हणजे मायेचा सागरं आहे, समुद्र पाहतांना डोळयाची नजर जिथवर जाईल तिथवर समुद्र दिसतो म्हणजे समुद्र आपल्या डोळयात देखील मावत नाही त्यापेक्षाही कितीतरी पटीने आपली आपल्या लेकराला जीव लावते. तिच्या जीवापेक्षाही जास्त ती आपल्या लेकरांवर प्रेम करते. तिलां असं वाटतं की, माझ्या लेकराला काही झालं नाही पाहिजे. मातृत्व ज्या स्त्रीला मिळालं त्या स्त्रीला जाऊन विचारा आई झाल्यावर काय समाधन मिळतं. आई होणं एवढं सोप्पं काम नाही. कारण आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आई एक साक्षात्कार आहे. साक्षात परमेश्वर सुध्दा आजपर्यंत आईची जागा घेऊ शकलेला नाही. देवाला प्रत्येक व्यक्तीवर माया, प्रेम व सांभाळ करता येत नाही म्हणून त्याने आई बनवली. त्यामुळे प्रत्येकाला आई मिळाली. समुद्राची शाई आणि आकाशाचा कागद केला तरी आईची व्याख्या लिहून होणार नाही असं हे आईचं प्रेम आहे. जे प्रेम जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही. आईची माया ही ज्याला समजली तो धन्य झाला. कारण नशिबानं ज्यांच्याकडं आई आहे ते खुप भाग्यवान आहेत. ज्याच्या
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय ! शब्दांनी करतो प्रहार, धाडसी झुंजार, समाजसुधारणा निर्धार, विचारांत बळ शब्दांना धार, सुरक्षित समाजाचा शिल्पकार, झेप गरुडाची नजर सभोवार, असत्याचा करतो संहार, हाती लेखाणी तलवार. अशा या शब्दअलंकाराने लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची म्हणजेच पत्रकार या व्यक्तीमत्वाची व्याख्या तोंड भरुण केली तरी कमीच आहे असं मी नक्कीच म्हणणे. समाजासाठी हा सत्याचा आरसा समजला जातो. लोकांचा प्रचंड विश्वास असणारं प्रतिभावंत व प्रामाणिक उदाहरण म्हणून पत्रकारीतेकडं पाहिलं जातं. वृत्तपत्रविदया अवगत करण्यासाठी लेखणी तलावार व शब्दांची ढाल करुन अन्यायाच्या विरोधत लढण्यासाठी सज्ज असलेला पत्रकार. भल्याभल्यांना आपल्या शब्दांनी व परखड लेखणीच्या माध्यमातून चारीमुंडयाचित करणारा पत्रकार. पण हल्ली पत्रकरीता क्षेत्रामध्ये काही उणीवा जाणवू लागल्या आहेत. पत्रकारीतेला एक वेगळंच वळण लागलेलं पहावयास मिळत आहे. जनतेच्या मनात पत्रकारीतेबद्दल ज्या भावना होत्या त्या भावना बदलल्याचं कुठंतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जाणवत आहे. गेल्या काही वर्षापूर्वी पत्रकाराची जी छाप होती ती आज राहिली नसल्याचे
लेडीज फस्ट मग ‘ आई शेवटी का जेवते ’ ? प्रश्न सरळ आणि साधा आहे , आपल्या अवती भोवती असे अनेक प्रश्न आपल्याला कदाचित माहित नसतात , कदाचित ते आपल्या जवळ असूनही आपण त्या गोष्टीपर्यंत पोहचत नाहीत . पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे आई . आईविना जीवन व्यर्थ आहे . जगातली सर्व ताकद एकीकडे व फक्त एकटी आई एकीकडे अशी ही आईची व्याख्या आहे . म्हणतात ना आकशाचा कागद आणि समुद्राची शाई जरी केली तरी आईविषयी निबंध लिहिला जाऊ शकणार नाही कारण ते सुध्दा कमी पडेल . " स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी " हे अगदी तंतोतंत खरं आहे . ज्याच्याजवळ आई नाही त्याला विचारा आई खरंच काय असते . आईची व्याख्या इतक्या सहज कोणीच करु शकत नाही . देवाला प्रत्येकाडं वेळ देणं होत नाही त्यामुळं त्या परमेश्वरांन आईच्या रुपात आपल्यावर माया करत आहे . आई वडीलांएवढं प्रेम जगाच्या पाठीवर कोणीच करु शकत नाही . स्त्रीमध्ये नवनिर्माण करण्याची क्षमता असते . तिच्यामध्ये असणारी सकरात्मक उर्जा परिवर्तन करण्याची हिम्मत असते . प्रत्येक स्त्री कोणाची तरी आई , बहिण , पत्नी , मुलगी असते . आईएवढं महान व्यक्तीमत्व जगात कोणीच नाही .
चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं ! महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांच्याविषयी काही समारात्मक व नकारात्मक गोष्टींचा आढावा आपण आज या संपूर्ण लेखामध्ये पाहणार आहोत. सोबतच चालक वाहक व प्रवाशांबाबतही थोडसं परखड भाष्य या ठिकाणी होणार असल्यामुळे काय अपेक्षीत बदल परिवहन मंडळाकडून व चालक वाहक व प्रवाशांकडून अपेक्षीत आहेत, त्याबाबत लोकभावनेची जोड प्रत्येकाच्या भावनेशी कशी जोडता येईल याबाबत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र राज्य हे भावनिक माणणांची खान व सकारात्मक विचारांच्या हिऱ्यांची खान असेलेले राज्य म्हटले तर वावगे ठरु नये. कारण इथें माणूस सकारात्मकच विचार करणारा व वागणारा नक्कीच सापडेल. सर्वसामान्यांपासून ते असामान्यांपर्यंतचा माणूस हा बसने प्रवास नक्कीच करतो. प्रवास ही प्रत्येकाच्या आयुष्यातील निरंतर पक्रिया असल्यामुळे प्रत्येकाला याची गरज नक्कीच भासते. आपण आता मुळ मुद्याचं बोलूया ! महत्वाचं म्हणजे स्वत:चा व्यक्तीमत्व विकास जर साधायचा असेल तर नम्रता हे मूल्य प्रत्येकाच्या अंगी असणं फार महत्वाचं असतं. चालक, वाहक व प्रवाशी या बाजूशिवाय परिवहन मंडळाचं ध्येय पूर्ती होवू शकत नाहीत व
राहुल जोगदंडची “ यशोगाथा ” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास ' माय मराठीचा झेंडा सातासमुद्रापल्ल्याड वृध्दापकाळात आपण म्हणतो की जीवनाचं सार्थक झालं . पण हेच सार्थक जर तारुण्यात झालं तर हा आनंद वेगळाचा अनुभवयाला मिळतो याच शंक्काच नाही . ही यशोगाथा आहे आनंदगावच्या राहुल शंकर जोगदंडची . आनंदगांव ते दुबई यशाची गुरूकिल्ली हस्तगत करण्याची कला राहुल यांनी जीवनात येऊन कशा प्रकारे खडतर प्रवास करुन मिळवली त्याचाच आपण या ठिकाणी थोडसं विषयांतर करुन व काही जीवनात घडलेल्या चांगल्या व वाईट गोष्टी आपणासमोर मांडण्याचा इवलास प्रयत्न या ठिकाणी होणार आहे . आज काल दुबई म्हणजे भारतात या राज्यातून त्या राज्यात जाणं जेवढं सोपं आहे त्या पेक्षाही तंत्रज्ञान विकसीत झाल्याने व डीजीटल टेक्नॉलॉजीमुळे अगदी सोपच होऊन गेलं आहे . आजकाल दुबईला जाणं ही काही नवलाईची गोष्टी नाही किंवा यात काही प्रत्येकासाठी नाविन्यच उरलेलं नाही असं भासू लागलं तर आहेच , पण प्रत्यक्षदर्शी परिस्थितीही निर्माण झाली आ
आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असणाऱ्या पत्रकारीता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे वसंत मुंडे समाजासमोर एक आदर्श पत्रकार म्हणून उभे आहेत . सामाजिक जाणीव असणारे पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा म्हणजेच त्यांच्या पत्रकारीता क्षेत्रातील खडतर प्रवास व त्यांचा भला अनुभव होय . पत्रकार वसंत मुंडे यांचे पूर्ण नाव वसंत माधवराव मुंडे असे आहे . लाडझरी ( तालुका परळी ) येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले . माध्यमिक शिक्षण घाटनांदूर ता . अंबाजोगाई या गावी पूर्ण केले . बी . ए . बी . जे . ( बॅचलर ऑफ जर्नालिझम ) डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठातून येथे पूर्ण झाले . स . न . 2003 पासून दैनिक लोकसत्ताचे बीड जिल्हा प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत आहेत . त्यापूर्वी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच दैनिक मराठवाडा साथी व दैनिक लोकपत्र या दैनिकांसाठी बातमीदार म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली होती . हा त्यांचा अल्पसा परिच
'यशाला' शॉर्टकट नाहीच ! जीवनात यश मिळवण्यासाठी जो तो धडपड करत असतो, आपल्या जीवनाचं ध्येय गाठण्यासाठी, यशाची शिखरं गाठण्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळी प्रगतीची मार्गं शोधून त्या माध्यमातून यश मिळवायचं असतं ते त्याला मिळतं सुधा. पण काही यश मिळवण्यासाठी एकाग्र बुध्दीमत्ता न वापरता, कष्ट न करता, आयतं मिळवं या अपेक्षेने कष्ट, मेहतन करत नाहीत व जीवनात नेहमी शॉर्टकटच्या शोधात असतात पण महापुरूष, संतांनी, साहित्यीकांनी एका ओळीत सांगितले आहे की, यश मिळवायचे असेल तर त्याला कष्टाशिवाय, मेहनतीशिवाय व एकाग्र बुध्दीमत्तेचा वापर करुन व्यवस्थापन केल्याशिवाय दुसरा तिसरा कोणताही पर्याय नाही. पण ते लोक ऐकायला मुळीच तयार होत नाहीत. शेवटी त्यांच्या पदरी राहतं ते अपयश. अशा निवडक लोकांच्या आयुष्यात त्यांना असं वाटतं की, आपल्या जीवनातील बदलासाठी एखादा चमत्कार घडावा व आपलं जीवनंच बदलून जावं, गरीबी ही प्रत्येकाच्या आयुष्यात असते. माणसांच्या गरजेनुसार प्रत्येकाची गरीबी ठरलेली असते. पण ती बदलणे आपल्या हातात आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती संगणक क्षेत्रातील गॉड फ ादर बिल गेटस म्हणतात, जर तुम्ही गरीब
लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे ….. पहाटे पहाटे जीवा शिवाची बैल जोडं …… असं गाणं म्हणत चार पाच च्या सुमारास गणपत रोज उठायचा , नांगर घेऊन शेतात नांगरत असे , लवकर लवकर शेतातलं काम आटोपून , आपल्या बैलजोडीला वैरण काडी करुन , बरोबर सात वाजता घरी यायचा हात पाय धुवायचा अन् बायकोला म्हणलायचा अगं ए कारभारणी रातीचं पिठलं अन् शिळी भाकर हाय का ? बाको लाडात येऊन म्हणायची आवं कारभारी आहे त्या दुरडीत घ्या अन रानातच जाऊन खावा . भाकरी आणि रातीचं पिठलं घरच्यापरीस रानातच गोड लागतय . हसून खेळुन दिवस जायचे . घरची सुखाची मीठ भाकरी खाऊन गणपत व त्याची कारभारीन सुखानं संसाराचा गाढा ओढत होते . रानात सगळीकडं हिरवळ पहावयास मिळायची वेळेवर पेरण्या व्हायच्या , वेळेवर शेतातली सर्व कामे आटपायची , शेतात पिकवलेला माल तातडीने आडती दुकानादारांडे नेऊन विकून त्यात मिळालेला पैका पाहिजे तेवढा वर खर्चासाठी ठेऊन उरलेला जीभेला आवर घालून , काळजाला कुलूप लावून पुढील आयुष्यासाठी जतन करुन बँकेत ठेवायचा .
ज्ञानाचा अथांग महासागर जर कुठं असेल तर तो पुस्तकं वाचण्यात आहे असं माझं मत आहे. ज्याची मैत्री पुस्तकांशी असते त्याचं मस्तक सशक्त असतं हे माझ्या अनेक संशोधनावरुन मला उमजलेलं आहे. हे सुध्दा माझं मत आहे. त्यामुळे विचारल प्रगल्भ करायचे असतील तर पुस्तकांशी मैत्री जेवढं लवकर होईल तेवढं करा. कारण या जगात पुस्तकांएवढं सुंदर काहीच नाही. आपण धरतीवर जन्म फक्त चांगलं जीवन जगण्यासाठी घेतला आहे. म्हणूनच जीवन चांगलं केंव्हा होईल जर विचार सशक्त असतील व सकारात्मक असतील. विचार तेंव्हाच सकारात्मक व सशक्त होतील जेंव्हा तुम्ही फक्त आणि फक्त पुस्ताकांशी मैत्री कराल. हे एक वेगळंच विश्व आहे आणि या विश्वास रमणारी माणसं ही अतिशय आनंदी असतात हे माझ्या वैयक्तिक संशोधनावरुन मला लक्षात आलेली बाब आहे. हल्ली सोशल मिडीया व उगवत्या तंत्रज्ञानाच्या वाटचालीवरुन असं लक्षात येतं की पुस्तकाच्या दुनियेचा ऱ्हास झाला आहे. पण असं काहीच नाही जसं दारुडयाला दारुचं दुकान न सांगता सापडतं तसेच पुस्तक वाचणाऱ्या वाचनवेडया व्यक्तीला पुस्ताकाचं वाचनालय न सांगता सापडतं. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्याची असलेली पुस्तकांशी मैत्री. त्यामु
Comments
Post a Comment