Posts

Showing posts with the label सामाजिक लेख

एक व्हिडीओ कॉल आणि बँक खाते रिकामे झाल्यावर व्हाल बेहाल …

Image
एक व्हिडीओ कॉल आणि बँक खाते रिकामे झाल्यावर व्हाल बेहाल … दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारी मोठया प्रमाणत वाढत आहे. सायबर सेलच्या आवाक्याबाहेर सायबर गुन्हेगारी जाईल की काय अशी भिती वाटत आहे. जसं आयटी क्षेत्रात दररोज विविध शोध लागत आहेत व आयटी क्षेत्रामुळे मानवाच्या दैनंदिन जीवनात क्रांती झाली तसंच सायबर गुन्हेगारी क्षेत्रातही आयटी क्षेत्राप्रमाणेच नवनवीन तंत्राज्ञानाचा वापर करुन जणू सायबर गुन्हेगारी प्रगतीपथावरच आहे असं वाटत आहे. सायबर गुन्हेगारांनी मात्र नेहमीच अटकेपार झेंडे लावून सर्वसामान्यांची आर्थिक लूट आजवर केली आहे. कधी बँक खाते रिकामे करतात, तर कधी फोन करुन एटीएम क्रमांक मागून ओटीपीद्वारे बँक खात्यामधील पैसे गायब करतात, तर कधी क्रेटीड कार्डवरुन शॉपींग करतात, तर कधी मॉलध्ये जाऊन डेबीड कार्डवरुन शॉपींग करतात, तर कधी युपीआय ॲपच्यामाध्यमातून कोड स्कॅनर पाठवून आर्थिक लुट करतात, तर कधी गुगल पे, फोन पे किंवा इतर वॉलेटवर रिक्वेस्ट पाठवून डल्ला मारतांनाचे प्रकार आपण नेहमीच पाहिले आहेत. आता हे सर्व चोरीचे प्रकार आपण आपल्या दैनंदिन जीवनशैली मध्ये ॲडजस्ट केले आहे आणि आपण दुसरं करु तरी काय शकतो...

हसवणारा पाहिजेच ...

Image
तणावमुक्त आयुष्य जगायचं असेल तर जीवनात आनंदमय क्षण खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. तुम्ही पैशाने कितीही श्रीमंत असाल पण आनंद कधीही पैशाने विकत घेऊ शकणार नाहीत. आनंद होणं हे एक नैसर्गिक वरदान आहे. आनंद हा मानवी आयुष्यातला अनमोल रत्न आहे. म्हणूनच प्रत्येकाच्या कुटूंबामध्ये एक तरी हसवणारा व्यक्ती पाहिजेच कारण हा आयुष्याचा महत्त्वाचा व अनमोल भाग आहे. तुम्ही एखादा दिवस उदास झालात तर त्या क्षणी तुम्हाला तेंव्हा सहानुभूतीची व आधाराची अत्यंत आवश्यता असते. त्या क्षणी जर तुम्हाला हसवणारा व आनंद देणारा कोणी भोटला तर तो तुमचा दु:खाचा क्षण क्षणार्धात आनंदाचा नक्कीच करेल. एरवी आपण मनोरंजनाचा भाग म्हणून विनोदी चित्रपट विनोद, विनोदी कथा, विनोदी नाटकं, चित्रपटंव विनोदी कार्यक्रम पाहतो कारण त्याची आपल्याला का गरज आहे आणि हे जर जाणून घ्यायचा असेल तर त्या हसवणार्‍या व्यक्तीला जाऊन विचारा हसवण्यासाठी किती मेहनत व कष्ट लागतात. समाजात सामाजिक कार्य करण्यासाठी खूप मोलाचे योगदान द्यावं लागतं स्वतःला खूप झिजवावं लागतं, प्रचंड मेहनतीच्या जोरावर समाजसेवा सफल होते व श्रेष्ठ ठरते. इतरांना हसण्यासाठी हसवणार्‍या व्यक्त...

कंट्रोल झेड इज नेव्हर इन आवर लाईफ ...

Image
  कंट्रोल झेड ही क्रिया संगणकाशी निगडीत आहे. त्यामुळं ती समजून घेणं महत्वाचं आहे. कंट्रोल झेड ही एक कॉम्प्युटरवर दैनंदिन कामकाज करतांना वापरली  जाणारी शॉर्टकट की आहे अर्थात काम करत असतांना एखादी क्रिया आपल्याला नको असेल किंवा एखादी झालेली चूक, क्रिया पूर्ववत करण्यासाठी या कीज चा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे संगणकावर केलेल्या कामात अचूकता येते. ही की, Undo या सुवीधेचे संक्षिप्त रुप आहे. तुम्ही कधीही जीवघेण्यास स्पर्धेच्या युगात अशा चुका करु नका की, त्याला Undo हे ऑप्शन अर्थात कंट्रोल झेड नसणार आहे. आयुष्याच्या पायर्‍या चढत असतांना कधीही मागे वळुन पाहू नका. इतिहासाच्या अभ्यास करतांना मागे वळुन जरुर पहा कारण आयुष्याच्या पायर्‍या ह्या जोपर्यंत यश संपादन होत नाही तोपर्यंत चढयच्याच असतात व इतिहासाचा अभ्यास करतांना अनुभवाच्या जोरावर आपलं जीवन जगायला शिकायचं असतं. प्रत्येकजण आयुष्यामध्ये रोज नवनवीन गोष्टी शिकत असतो. अर्थात माणूस आयुष्यभर काही ना काही शिकतच असतो, व्यक्ती हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो. पण हे सर्व काही होणं जीवनात एकदाच असणार आहे. जसं निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच पर...

‘घरबसल्या कमवा’ चं पेटलं रानं, अन् सोशल मिडीयावर उधाणं आलंया तुमच्या खिशाला कात्री लावाया, चोरटं आलंया !

Image
कोरोना काळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, बेरोजगार झालेल्या तरुण वर्गाला आता काहीतरी कामधंदा करणं गरजेचं आहे, त्यामुळं प्रत्येकजण नोकरीसाठी शोधमोहीम सुरु करतो. उदरनिर्वाह करण्यासाठी काही नाही काही पावलं उचलायला हवीतच. त्यामुळंच अनेकांचा कल हा आपल्याला पटकन कुठंतरी काम मिळेल अशी आशा बाळगुन असतो व ताबडतोब स्मार्टफोनच्या माध्यमातून नोकरीच्या शोधासाठी ऑनलाईन शोधमोहिम सुरु करतो. एरवी तरुण वर्ग घरबसल्या काही ना काही पार्ट टाईम जॉब मिळवण्याच्या धडपडीत नेहमीच असतो. ऑनलाईन नोकरी मिळवण्यासाठी किंवा घरबसल्या प्रत्येकजण काही तरी काम मिळवून त्यातून पैसा कमवण्याचा अनेकांचा त्याकडे ओघ तर असतोच शिवाय त्याप्रमाणे प्रयत्नशिलही असतो. एक्ट्रा इनकम कोणाला नको आहे, प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं आहे. त्यामुळे पैसा जेवढा जास्त कमवता येईल तेवढा कमवावा असा सर्वांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. ऑनलाईन शोधमोहिम सुरु केल्यानंतर अनेक सोशल मिडीयावर अनेक फसव्या जाहिराती असतात व काही खर्‍या जाहिराती असतात. आता हया खर्‍या आणि फसव्या कशा ओळखायच्या हा सर्वांसमोर खुप मोठा पेच आहे. सोशल मिडीयावर ऑनलाईन पैशांवर डल्ला मारणारी टोळी न...

भुकेल्यास भाकर देऊ, अनाथां निवारा, बदलवून टाकू आपुला महाराष्ट्र सारा …

Image
भारतीय मराठी भोषेतील गझलसम्राट, कवी, महान साहित्यीक तथा पत्रकार श्री सुरेशजी श्रीधर भट   यांनी त्यांच्या ‍कवितेच्या ओळीतून मानवतेला खूप मोठा संदेश दिला आहे. जगातील जेवढे धर्म आहेत त्यापैकी सर्वश्रेष्ठ धर्म हा मानवधर्म आहे. समाज हा विविध अंगानी बनला आहे, एकटा माणूस समाज कधीच होऊ शकत नाही. समाज होण्यासाठी विचार सम गरजेचे असते व ते असण्याने समाज बनतो. समाजाच्या व्याख्या व समाज म्हणजे परस्परांशी आंतरकिया करणाऱ्या व्यक्ती आणि समूहांची मिळून बनलेली एक व्यापक संघटना-व्यवस्था होय. सामाजिक आंतरक्रियेमुळेच व्यक्ती आणि समूहात निश्चित स्वरूपाचे सामाजिक संबंध निर्माण झालेले असतात. केवळ लोकांचा समूह म्हणजे समाज नव्हे. जो समाजात वावरतो, ज्याला समाजाची व्याख्या माहित आहे, ज्याला समाज म्हणजे काय कळतो व ज्या व्यक्तीला सामाजिक व समाजजीवनाची जाणीव आहे तोच धर्मांच्या पलिकडे जाऊन खरी समाजसेवा करतो. तसेच समाजसेवेचं दर्शन त्याच व्यक्तीकडून घडते. महाराष्ट्र ही अशी पावनभूमी आहे जिला सर्वश्रेष्ठ संतांचा पदस्पर्श झालेला आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच महाराष्ट्राच्या मातीत अनेक महापुरूषांनी जन...

सायबर गुन्हेगारी फोफावली …

Image
ऑनलाईन फसवणुकीचा कहर झाला आहे. सायबर गुन्हेगारी एवढया मोठया प्रमाणत फोफावली आहे की, त्याला आळा घालण्यासाठी एका स्वतंत्र यंत्रणेची गरज सध्या भारताला आहे. संगणक क्षेत्रात क्रांती झाल्यापासून ते आजपर्यंत संगणक क्षेत्रात अमुलाग्र मोठे बदल झाले व पुढेही होतीलच. पण व्हायरस, फिशींग यां सारख्या फसवणुक व नुकसान करणार्‍या गोष्टींचा जो कलंक संगणक क्षेत्राला लागला आहे आणि तो पुसण्यासाठी आता प्रशासनाला जनहित लक्षात घेऊन खुप मोठया प्रमाणावर जोर लावावा लागणार आहे. हे आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे. एक अशी घटना घडली होती की, एका अल्वयीन मुलीकडे तिच्या मामाचा मोबाईल फोन होता व तिला एक फोन आला व मोबाईलच्या माध्यमातून मामाची खुप मोठी फसवणुकी झाली आहे व याबाबत सायबर तज्ञांना सांगण्यात आलं की, माझ्या भाच्चीला काल एका अनोळख्या व्यक्तीचा फोन आला व तिला लॉटरी लागल्याचं सांगून कोटयावधी रुपये आता तुम्हाला मिळणास असंही सांगण्यात आलं, पण त्या अल्पवयीन मुलीला फसवणुकीबाबत कसलाही गंध नव्हता. त्याबाबत तीला कसल्याही प्रकारचे ज्ञान नव्हते ही गोष्टी तिने तिच्या मामाला सांगितली की, मला मोबाईलवर कोटयावधी रुपये मिळणार आहेत ...

बंड करा …

Image
  बंड करा … तुम्ही एखाद्या ठिकाणी कोणत्याही स्तरावर काम करत असाल तर तुम्हाला मानसिक त्रास हा होतोच. हा कृत्रिम मनुष्यनियम झाला आहे.   जीवघेण्या स्पर्धेच्या व धकाधकीच्या जीवनात फास्ट फॉरवर्ड दुनियेत माणुसकी अजिबातच शिल्लक राहिली नाही. जो तो मानसिक तणावात वावरत आहे. ज्याला त्याला मानसिक त्रासामधुन आपले जीवन जगावे लागत आहे. जोतो वरिष्ठांचा, समाजातील विशिष्ठ व वरिष्ठ घटकांच्या दबावाखाली येऊन काम करतो आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व इतर विविध क्षेत्रांमधील वाढत्या मानसिक दबावतंत्रामुळे अनेकांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्याचं कारण म्हणजे ते समाजामध्ये एडजस्ट झालेच नाही व त्याचा परिणाम म्हणून मरण पत्कारलं. जीवनात काही लोकं तत्वनिष्ठ व स्वाभिमानी असतातात. त्यांना समाजातल्या काही गोष्टी नेहमीच बोचत असतात, खटकत असतात. त्यामुळे अशा घोडयांचा आणि समाजामधील कुविचारी गाढवांसोबत मुळीच ताळमेळ लागत नाही. त्यामुळे ते बंड करतात व आपला स्वतंत्र रस्ता निवडून समाजापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात. अनेक संस्था, कंपन्या, शासकिय कार्यालयं, पक्ष इत्यादी ठिकाणी अनेकांना काम करतांना आपल्या वरिष्ठ...

कोणासाठी काहीतरी करायला हवं !

Image
  कोणासाठी काहीतरी करायला हवं ! भविष्यकाळ सुखाचा जावा म्हणून प्रत्येकजण वर्तमानकाळात अहोरात्र परिश्रम करत असतो, अनेक संकटांना सामोरे जाऊन दिवसेंदिवस संघर्ष करत असतो, परंतू जीवावर बेतलेल्या कोरोनासारख्या संकटामुळं व एकूणच सर्वच परिस्थितीमुळं जनजीवन विस्कळीत होऊनल छिन्न विछीन्न झालं आहे. काय करावं सुचत नाही, जगावर ओढावलेल्या संकटामुळे स्थिती व परिस्थिती एकूणच चिंतन करायला लावणारी बाब बनली आहे. असं असतांनाच तरुण पिढी, व्यापारी, रोजंदारी करुन उदरनिर्वाह करणारे, शेतकरी राजा सर्वच जनता हैराण आहेत. प्रत्येकाच्या घरचं आर्थिक गणित कोलमडलं आहे आणि अत्यंत दयनीय अवस्था अनेकांची झाली आहे. एवढं भयान वास्तव असतांना देखील तरुण पिढीसह अनेक हौशी त्या सोशल मिडीयावर व्यंग, अश्लिल, कॉमेडी, स्टंट व्हिडीओ तयार करुन प्रसिध्द करत आहेत व नकोत्या बाबींचा प्रसार व प्रचार करण्यात मग्न आहेत. दिवसाला दिडजीबी इंटरनेट डेटा मिळतोय म्हणून आपण कोण, कुठं चाललोय, आपल्याला जीवनात येऊन काय करायचंय हेच मुळात विसरुन गेले आहेत, फक्त आणि फक्त टाईमपास बस्सं !. जागतीक महामारी कोरोनासारख्या रोगामुळे गेल्या दीड वर्षापासून जी स...

दीड जीबीनं ‘घोडे’, लावले कामाला …

Image
दीड जीबीनं ‘घोडे’, लावले कामाला …  pic source by : google.com इथं प्रत्येकजण मोबाईलच्याच भाषेत बोलतोय ! म्हणलं बुवा आपण पण थोडंसं बोलूयात म्हणून आज जवळ जवळ शालजोडे हाणायचा ईचार आला अन मग केलं सुरु, तर त्याचं असंय की, दीड जीबी इंटरनेटचा डेटापॅक एका दिवसात दिवाळीचं रॉकेट उडवावं तसं संपवणारी तरुण मंडळी अर्थात लंबे रेस के घोडे अर्थात देशाचा मजबूत असा भक्कम  पाया अर्थात उदयाचा भारत देश वगैरे वगैरे.  महिना असो अथवा तीन महिने असोत अन्न, वस्त्र, निवारा आणि स्मार्टफोन व त्यात दीड जीबीचा डेटा पॅक हया नवतरुण मंडींसह सर्वांच्याच मुलभूत गरजा बनल्या आहेत. इथं प्रत्येकाकडं मोबाईमध्ये दीड जीबी डेटापॅक असतोच व त्या मोबाईलवरच्या त्या टचपॅडवर अंगठा खाली वर सरकतांना कधी दिवस उगवला अन कधी मावळला याची जराशीही चाहूल तरुण मंडळींना आजकाल लागत नाही. त्या टाईमपासच्या नादात वडीलधाऱ्यांनी सांगितलेली कामं सुध्दा रेंगाळली जातात. तसेच जीवनात अमुलाग्र असा नको तो बदल हया दीड जीबी च्या पॅकनं समाजात करुन ठेवला आहे. कधी काळी इंटरनेचा वापर हा संदेशवहन तसेच महत्वाच्या कामासाठीच असतो असं समीकरण होतं व ...

जरा जपूनच बरं; ऑनलाईन फसवणुकीचा कहर ...

Image
जरा जपूनच बरं; ऑनलाईन फसवणुकीचा कहर ... बंधूंनो आणि भगिनींनो, तुमच्या हातात स्मार्टफोन मोबाईल आहे. त्यामुळं अगदी स्मार्ट पध्दतीनं तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणुक करुन अगदी सहजच गंडवलं जावू शकतं. तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. जरा जपूनच बरं. लॉकडाऊन काळात गेल्या अनेक महिन्यांपासून सायबर गुन्हयांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळं देशातील अनेकांचे आर्थिक नुकसान होऊन त्यांच्या सोबत ऑनलाईन माध्यमाद्वारे म्हणजेच मोबाईल, सोशल मिडीयाच्या माध्यमातून फसवणुक झाली आहे. अनेकांना लाखोंचा गंडा बसला आहे. त्यामुळे यापासून तुम्हाला स्वत:चा बचाव करायचा आहे. प्रथमत: कोणत्याही प्रकारचा अनोळखी फोन कॉल आला व त्यांनी सांगितलं की, मी बँकेतू बोलतोय. असं म्हटल्याबरोबर तो खरंच बँकेतूनच बोलतोय का ? याची खातरजमा करा, त्यांनी केलेला फोन क्रमांक हा खरंच बँकेचाच आहे. का ? बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही त्याचा शोध घ्या व खात्री करा किंवा त्या फसव्या असणाऱ्या फोन कॉलवर कोणी निर्बंध घालावा म्हणून संबंधीत कंपनीकडे रिपोर्ट तर केला नाही याचीही खात्री करा. हे झालं एक. आता दुसरं. हल...

अंबाजोगाईचा सांस्कृतिक वारसा जपणारे कलावंत, सोशलमिडीयावर नेटकर्‍यांना मिळतोय सदाबहार गाण्यांचा अस्वाद

Image
अंबाजोगाईचा सांस्कृतिक वारसा जपणारे कलावंत सोशलमिडीयावर नेटकर्‍यांना मिळतोय सदाबहार गाण्यांचा अस्वाद   अंबाजोगाईचा इतिहास पाहिला तर अंबाजोगाईचा इतिहास प्रचंड मोठा आहे. अंबाजोगाईने अनेक कलावंत घडवले आहेत. अंबाजोगाईने महाराष्ट्राला अनेक कलावंत दिले आहेत. अंबाजोगाई शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी तर आहेच शिवाय अंबाजोगाई कलावंतांची खान आहे असं म्हटलं तर वावगं ठरु नये. अंबाजोगाईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे कलावंत अंबाजोगाईच्या खानीत नव्याने तयार होत आहेत व झालेही आहेत. तरुण पिढी ही संगीत क्षेत्राकडे वळतेय हे पाहून आपल्या भुवया नक्कीच उंचावतील व ही बाब अभिमानाची व कौतुकाची आहेच. विविध क्षेत्रातील आपापल्या जबाबदार्‍या पार पाडून हे सर्व कलावंत संगीत क्षेत्रातही आपला ठसा नव्या जोमानं उमटवत आहेत. ही अंबाजोगाईकरांसाठी अभिमानाची बाब आहे. काही कलावंतांनी संगीत क्षेत्रात स्वतःला इतके वाहून घेतले आहे की, आता गाणंच त्यांचा श्वास बनला आहे. संगीत क्षेत्रातही अनेक कलावंत विविध कलागुणांनी समृध्द असल्याने त्यांचे अनेक पैलू पहावयास मिळतात. आपल्या सर्वांना वरदान ठरत असेलेली सोशल मिडीया जसं एक...

आई माझी मायेचा सागर …

Image
आई माझी मायेचा सागर … या विश्वात असं एकच न्यायालय आहे जिथं सर्व गुन्हे माफ होतात ती म्हणजे आई. आई म्हणजे मायेचा सागरं आहे, समुद्र पाहतांना डोळयाची नजर जिथवर जाईल तिथवर समुद्र दिसतो म्हणजे समुद्र आपल्या डोळयात देखील मावत नाही त्यापेक्षाही कितीतरी पटीने आपली आपल्या लेकराला जीव लावते. तिच्या जीवापेक्षाही जास्त ती आपल्या लेकरांवर प्रेम करते. तिलां असं वाटतं की, माझ्या लेकराला काही झालं नाही पाहिजे. मातृत्व ज्या स्त्रीला मिळालं त्या स्त्रीला जाऊन विचारा आई झाल्यावर काय समाधन मिळतं. आई होणं एवढं सोप्पं काम नाही. कारण आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आई एक साक्षात्कार आहे. साक्षात परमेश्वर सुध्दा आजपर्यंत आईची जागा घेऊ शकलेला नाही. देवाला प्रत्येक व्यक्तीवर माया, प्रेम व सांभाळ करता येत नाही म्हणून त्याने आई बनवली. त्यामुळे प्रत्येकाला आई मिळाली. समुद्राची शाई आणि आकाशाचा कागद केला तरी आईची व्याख्या लिहून होणार नाही असं हे आईचं प्रेम आहे. जे प्रेम जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही. आईची माया ही ज्याला समजली तो धन्य झाला. कारण नशिबानं ज्यांच्याकडं आई आहे ते खुप भाग्यवान आहेत. ज्याच्या...

एवढ्यात हार मानू नका; देश पुन्हा नव्यानं उभा करु ! एकमेकांना मदत करा, आपली माणसं ओळखायला शिका; नाहीतर भविष्यात मागाल भिका !

एवढ्यात हार मानू नका; देश पुन्हा नव्यानं उभा करु ! एकमेकांना मदत करा, आपली माणसं ओळखायला शिका; नाहीतर भविष्यात मागाल भिका ! देशाची लोकसंख्या पाहता देशात गरीबीचे सावट आहेच, शिवाय दिवसेंदिवस गोरगरीब, मध्यमवर्गीय नेहमीच कोणात्या ना कोणात्या संकटाशी सामना करत असतो, त्यांचा संघर्षही तेवढाच. गेल्या महिनाभरा पासून कोरोनामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अनेकांचे भूकबळी गेले आहेत. यावर मात करत प्रत्येकजण येईल तो दिवस कसाबसा पुढे ढकलून उद्याचा दिवस नक्कीच सखुदायक होईल अशी आशा ठेवून जगत आहे. शासन देशापातळीवर, राज्यपातळीवर जिल्हा पातळीवर, तालुकापातळीवर व गावपातळीवर कोणीही उपाशी राहू नये याासठी विविध उपाययोजना करत आहे. अन्नधान्य पुरवठा करत आहे. शिवाय दानशुर व्यक्ती, विविध सामाजिक, सेवाभावी संस्था, वैयक्तिक, व्यापारी व इतर निस्वार्थपणे गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहेत. गेल्या महिनाभरापासून देशातील जनतेनं देशासाठी दिलेलं   योगदान खरंच खूप मोठं आहे. जनतेनं पुकारलेल्या एक दिवसीय बंद मुळे देशातील लॉकडाउन आजपर्यंत यशस्वी झाले व होत आहे. भाविष्यात रुग्णांची संख्या न...

मदतीला धावा रे …

Image
मदतीला धावा रे … प्रत्येकाच्या डोक्यात एकच विचार आहे. हा कोरोना कधी जाईल. कोणाला वाटतं की, मी आता घरात बसुन कंटाळलो आहे. मला घराबाहेर कधी पडता येईल. माझ्या मित्रांना, आप्तेष्ठांना, नातेवाईकांना कधी भेटता येईल. असंच बरंच काही कोणाला काही ना काही वाटत राहिल. पण शेतकऱ्याला चिंता शेतातील मालाची, नाही पिकवला तर विकणार काय ? आणि पोटाला खाणार काय ? त्यामुळे त्याला चिंता शेतातील सोनं उगऊन ते आपल्या सर्वांच्या पोटापर्यंत आणून आपण जेवण करुन तृप्त झाल्याचा ढेकर देण्यापर्यंतची संपूर्ण जबाबादरी त्या‍ बिचाऱ्याची. त्याची परिस्थिती आजही डगमगतीच आहे. अशा परिस्थितीमध्ये सुध्दा तो देशाला जगवतोच आहे. त्याच्यासह शेतमजुर, गोरगरीब, काबाडकष्‍ट करणारांना सुध्दा तो जगवतोच आहे. त्याला दिलासा मात्र आजतागायत मिळालाच नाही. त्याला आधार कोणाचाच नाही आणि आता त्यात हे नवीन संकट. सध्या कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. प्रत्येकाची दैनंदिन दिनचर्या या व्हायरसने संपूर्णत: बदलून टाकली आहे. गोरगरीब जनतेचे हाल होत आहेत. शहरातील सर्वच नागरीक आता आपापल्या गावी खेडयाकडे जात आहेत. कोरोना सारखा व्हायरस माणसाचा जीव घेत...

माकडांच्या हातात मोबाईलचं खोकडं …

Image
माकडांच्या हातात मोबाईलचं खोकडं … तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ! आता हे काय नवीन. पण तुम्ही जे वाचताय ना, ते खरंच आहे. जर माकडांच्या हातात मोबाईल दिला, तर ते माकड, त्या मोबाईलचं काय करेल ?  हे तुम्हाला सांगण्याची मुळीच गरज नाही. कारण माकड हा प्राणी. त्यामुळे मोबाईल चालवायचा कसा, याचे ज्ञान त्यास नसल्यामुळे तो त्या मोबाईलचे काहीही करेल, त्याला हवं तसं करेल. तसंच जगामध्ये सर्वत्र कोरोना व्हायरसने थैमान घातले असतांना. प्रत्येकजण आपला जीव वाचण्यासाठी प्रयत्न करतोय.  त्यात भर म्हणून अशीच काही माकडं आपल्या समाजामध्ये आहेत. जे समाजाची दिशाभूल करण्यासाठी सज्ज असून याच मोबाईलच्या खोकडयाचा वापर वाईट पध्दतीने करत आहेत. देशात काय परिस्थिती आहे. याचं गांभिर्य व भान असल्याचं या माकडांना मुळीच दिसून येत नाही. परिस्थितीचं गांभिर्य लक्षात आलं असंत तर यांनी असं केलं नसतं मुळीच. जीवावर बेतण्याची परिस्थीती निर्माण झाली असतांना व्हॉटसॲप, टिकटॉक, फेसबुक, इन्सटाग्राम, टेलीग्राम व इतर सोशल मिडयाचा वापर करुन काहीजण अफवा पसरवणे, चुकीच्या माहितीचा प्रसार व प्रचार करणे, एखादा संदेश समाजामध्ये ते...

जीवंत रहायचे असेल तर घरातच बसा; दीड जीबी वाल्यांनो उगाच वळवळ करु नका

Image
जीवंत रहायचे असेल तर घरातच बसा; दीड जीबी वाल्यांनो उगाच वळवळ करु नका. आपल्या देशातील नेटकर्‍यांनी कोरोना वर विनोद करण्याची हद्दच पार केली आहे. जणू काही यांच्या एकट्यावरच हे जागतिक संकट आलं आहे. यांच्या डोक्यात अजूनही विनोदाचे फवारे सोशल मिडीयावर सुरूच आहेत. कोरोना या व्हायरसमुळे जगामध्ये कित्येकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. मात्र भारतामध्ये अजूनही या गंभीर व्हायरसला गांभिर्याने घ्यायला नेटकरी मुळीच तयार नाहीत. काही दीडशहाण्या दीडजीबी वाल्यांमुळे अफूची गोळी असलेल्या सोशल मिडीयावर बावळटांकडून उगाच नको त्या गोष्टींचा बाऊ होतांना दिसत आहे. यांनी कोरोना या व्हारसची गांभिर्याने दखल जर घेतली नाही तर येणार्‍या काळात शासनाला नक्कीच ठोस पावलं उचलावी लागतील. संचार बंदीच्या काळात नियमाचं पालन न करणे, उगाच घराबाहेर फेरफटका मारणे, विनाकरण गाड्या घराबाहेर नेउन मला कहीच होत नाही असा डायलॉग मारणे, अशा प्रकारचे विविध चाळे हे दीडशहाणी मंडळी करातंना दिसत आहे. माकडांच्या हातातल्या खोकड्यात दीड जीबी भरल्यामुळे हे अतिउत्साही माकडं उगाच वळवळ करतांना सोशल मिडीयावर पहावयास मिळत आहेत. शासन स्तरावर बे...

हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीच ...

Image
हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीच ... संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे, हा व्हायरस आला कसा यावर चर्चा करण्यापेक्षा, आता प्रत्येकाला आपला जीव वाचवण्याची भ्रांत पडली आहे. या रोगाची सुरूवात चीन देशात झाली. वुहान शहरामध्ये या रोगाची सुरूवात झाली असून यामध्ये अनेकजण मृत्यूमुखी पडले. तसा तसा याचा प्रसार संपूर्ण जगामध्ये वार्‍याच्या वेगाप्रमाणे पसरतोय व अनेकांचे जीव घेतोय. जीव गेलेल्या व्यक्तीचा देह सुध्दा पाहणं, त्यावर अंत्यसंस्कार करणं याचं सुध्दा भाग्य त्या परिवाराला मिळत नाही. याचं कारण म्हणजे हा रोग संसर्गजन्य आहे. या महामारीमुळे संपुर्ण जगामध्ये कडेकोट बंद पाळण्यात येतोय. प्रत्येक देशामध्ये किडयामुंग्यांसारखे लोक मरत असल्यामुळे आपापल्या स्तरावर रुग्णांची काळजी घेतली जात आहे. प्रशासन आपापल्या स्तरावर नागरीकांची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेवून देशवासीयांच्या आरोग्याची काळजी घेत आहे व मिडीया व सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम करत आहे. जेणे करुन मृत्यूदर कमी व्हावा. त्याप्रमाणे नैतिक जबाबदारी म्हणून आपणही आपापल्या पातळीवर प्रशासनाला सहकार्य करणे कर्तव्य ...

पीडीएफ मुळं वृत्तपत्रांवर वाईट वेळ ?

Image
पीडीएफ मुळं वृत्तपत्रांवर वाईट वेळ ? धक्काच बसला ना ? होय खरंच  असं नक्कीच झालं आहे. आता तुम्ही म्हणाल ही पीडीएफ  म्हणजे काय भानगड आहे ? होय तर, एखाद्या समस्येचं निराकरण होत नसेल तर त्याच्या मुळाशी जायला नको ? गेलंच पाहिजे ! नाही तर आपल्या बाबतीत नेमकं काय ? कुठे ? केव्हा ? कसं ? आणि का ? घडलं हे नक्की कळलंच नसतं ! हा तर   पत्रकारीतेचा नियमच आहेे. हल्ली एक पीडीएफ  नावाचं तंत्रज्ञान विकसीत झाल्यामुळं वृत्तपत्र आपल्या अगदी खिशातच येउन पोहचले आहे. म्हणजे स्मार्ट पध्दतीने स्मार्ट फोनमध्ये. कारण पीडीएफ  म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट असं त्याचं विश्लेषन रुप व पीडीएफ  PDF हे त्याचं सक्षीप्त रुप आहे. आता तुम्ही म्हणाल या तंत्राज्ञानाचा आणि वृत्तपत्राचा काय संबंध ? होय नक्कीच आहे तर संबंध. त्याचं असं आहे की, हल्ली सोशल मिडीयावर व्हॉट्ट्सअ‍ॅप नावाचं एक अ‍ॅप आहे. अ‍ॅप म्हणजे एक प्रोग्राम. याच्या माध्यमातून आपण वृत्तपत्र तयार केल्यानंतर संपूर्ण वृत्तपत्राची एक  फाईल पीडीएफ  स्वरुपात वाचकांना पाठवू शकतो. म्हणजे प्रिंट व्हर्जन वेगळे आणि पीडीएफ ह...