Posts

Showing posts from November, 2016

बळीराजाची होतेय दिशाभुल अन् सरकारचं चालूय ‘आठ हात लाकूड, नऊ हात धलपी’ काढण्याचं काम

बळीराजाची होतेय दिशाभुल अन् सरकारचं चालूय ‘आठ हात लाकूड, नऊ हात धलपी’ काढण्याचं काम' शेतकऱ्यांना , कामगारांना व सर्वसामान्य भोळयाभाबडया जनतेला खोटी आश्वासनं देऊन गेली पन्नास वर्षे पुढाऱ्यांनी गादया मिळावल्या . विकासाच्या नावचा पत्ताच नाही , निवडणुक जवळ आली की नेतेमंडळीचा शहणपणा जागा होतो . गल्ली बोळांपासून ते झोपडपट्यांपर्यंत पायातली जोडे झिजवुन ही लोकं घर ना घर पिंजून ‘ मतं दया ’ च्या नावाखाली काढतात . निवडुन आल्यानंतर व निवडणुकीपुर्वीची गत म्हणजे निवडणुकीपुर्वी मतं मागायला येणारी पुढारी मंडळी ही तेहतीस कोटी देवांची माता ‘ गाय ’ (Cow) च्या रुपात येतात अन् निवडणुकीत विजय प्राप्त झाल्यानंतर त्यांचे ‘ वाघाच्या ’(Tiger) रुपात प्रवेश होतो . मत मागायला आपलेल्या नेत्यामध्ये जी नम्रता असते ती निवडणुकीत निवडून दिलेल्या नेत्यामध्ये नसते , असते ती फक्त उध्दट डरकाळी . असो , गेले ते दिवस अन् राहिल्या त्या फक्त आठवणी , अशा गोष्टींच्या इतिहासाचा अभ्यास करण्यात काही अर्थ नाही . आत्ता वेळ आहे