Posts

Showing posts from July, 2017

किडया-मुंग्यांसारखे मरण नको रे बाबा !

Image
किडया-मुंग्यांसारखे मरण नको रे बाबा ! -देशात दर 4 मिनीटात एक रोड अपघाताचा बळी- वर्तमानपत्र उघडले, टी.व्ही चालू केला, सोशल मिडीयासह विविध माध्यमांमधून देशभरामध्ये अपघाताच्या घटना पहावयास मिळतात. त्या इतक्या भयानक असतात की, पाहिल्यास मन उदास व जमीन पाय ठेवू देणार नाही. रोज किडया-मुंग्यांसारखी माणसं मरतांना आपण पाहतो, वाचतो, ऐकतो व नकळत विसरुनही जातो. पण त्यावर तोडगा काढण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही. नेमके अपघात का होतात व त्यासाठी उपाययोजना म्हणून ठोस पाऊल उचलत नाहीत किंवा एखादा सक्षम पर्याय शोधत नाहीत. देशात रोज किती तरी निर्दोश लोकं या अपघातासारख्या बकासुरास बळी पडतात. कधी समोरचा वाहन नीट चालवत नाही, कधी वाहन चालकच मद्यपान करुन वाहन चालावतो, कधी मोबाईल वर बोलतांना, तर कधी रात्रभर वाहन चालवल्यामुळे पहाटेच्या डुलगी लागल्यामुळे अशा विविध प्रकारचे कारणे अपघात होण्यासाठी पुरेशी आहेत. प्रत्येकवेळी शासनालाच दोष देणं फारसं चुकीचं ठरतं. जीव आपला आहे, शासनाचा नाही हे आपण कुठंतरी पार विसरुन गेलो आहोत. लक्ष आपले वाहन नीट चालवण्याकडे नसून धावपळ, घाई, व लवकर पोहोचणे याकडे जास्त असते. हल्

प्रसिध्दीसाठी व स्वार्थासाठीच शेतकऱ्यांचा पुळका !

Image
प्रसिध्दीसाठी व स्वार्थासाठीच शेतकऱ्यांचा पुळका ! राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या पार हाताबाहेर गेल्या असल्या तरी शासनाला काही जाग येईना. शेतकऱ्यांना फक्त मदत व कर्जमाफीचे आश्वासन दिले व घोषणा केली, मात्र थेट शेतकऱ्यांच्या पदरात शुन्य इतकी मदत मिळाली आहे. दहा हजार देऊ, कर्जमाफी करु, तत्वत: निकष इत्यादी सर्वांचा शेतकऱ्याला आत विट आला आहे. कधी शेतावरचा बांध न चढलेले, अर्धवटराव, स्वत:ला शेतकऱ्यांचे नेते म्हणवणारे व शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून शेतकऱ्यांचा फक्त स्वप्रसिध्दीसाठी व स्वार्थासाठीच पुळका असल्याचं सोंग करणारे, वर्तमानपत्राच्या व इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या माध्यमातून स्वत:ची प्रसिध्दी करत आहेत. खरंच यांना माहिती आहे का ? की, शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या घरची चुल कशी पेटत असेल, शेतकऱ्यांच्या भावना कधी समजून घेतल्या का? उगाच शेतकऱ्यांच्या  प्रश्नावर लढा देत आहोत असे भासवून शेतकरी नेते म्हणवणारे ढोंगी पुढाऱ्यांनी आपली दुकाने व घरं मालामाल केली, पण शेतकऱ्यांच्या मालाला आजतागायत योग्य भाव मिळवून देऊ शकले नाहीत. हे नेते आपल्या महाराष्ट्राच्या मातीत ताठ मान

पुन्हाचा अन् उद्याचा प्रपंच करणारे शासनाचे ‘जावई’

पुन्हाचा अन् उद्याचा प्रपंच करणारे शासनाचे ‘जावई’ महाराष्ट्र हा इतर राज्यांच्या बाबतीमध्ये सहनशिल राज्य आहे . त्या राज्यामध्ये शासनाचे सर्व शासकिय विभाग विचारात घेता ग्रामपंचायत कार्यालय ते मंत्रालय हा प्रवास जनसामान्यांच्या कामामध्ये पुन्हाचा अन् उदयाचा प्रपंच करणाऱ्या शासनाच्या जावयांमुळे सर्वांनी अनुभवलेला असेलच . यातून कोणताही घटक वगळा जात नाही . नागरीकांनी त्यांच्या पायऱ्या झिजवणे , शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत त्यांचे खिसे गरम करणे , त्यांच्या मनमानी कारभाला बळी पडणे , अरेरावी , तुच्छ वागणूक , परिसर व कार्यालय अस्वच्छ अशा विविध गोष्टींनी वेढलेले कार्यालय म्हणजे शासकिय कार्यालय . त्यामध्ये काम करणारे शासनाचे जावई . याच शासनाच्या जावयांकडे एखादे काम घेऊन जा , गेल्याबरोबर त्यांच्या त्या कपाळावरील अठ्ठया पाहून काम न होण्याची संकेत मिळतात , त्यांची ती किडणी मागीतल्यासारखी नजर भुकेल्या वाघासारखी वाटते , दिवसातून चार वेळा कार्यालीयन कामकाज सोडून ऑफीसात कमी व चहाच्या टपरीवर दिसणारी