Posts

Showing posts from October, 2018

मोर्चे इथले संपत नाहीत ...

Image
मोर्चे इथले संपत नाहीत भारत देशामध्ये न्याय व हक्कासाठी मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले जातात, समाजातील वंचित घटक आपल्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी मोर्चे काढतात, शेतकरी त्यांच्या न्याय व हक्कासाठी मोर्चे काढतात, विद्यार्थी त्यांच्या न्याय व हक्कासाठी व त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मोर्चे काढतात, समाजातील विविध धर्मातील विविध जाती आरक्षणासाठी मोर्चे काढतात, शहराला पाणी मिळालं नाही म्हणून मोर्चे काढले जातात, वीज वेळेवर मिळत नाही म्हणून मोर्चे काढले जातात, शहरांमध्ये घाणीचे साम्राज्य वाढलं म्हणून मोर्चे काढले जातात, राज्यात वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून मोर्चे काढले जातात, अमानुषपणे बलात्कार होतात तेव्हा मोर्चे काढले जातात, डॉक्टर संप करतात, संविधान जाळले जाते म्हणून मोर्चे काढले जातात, भारत माता की जय कुणी म्हणत नाही म्हणून मोर्चे काढले जातात, सोशल मीडियावर एखादया महापुरूषाची बदनामी होते म्हणून मोर्चे काढले जातात,तिरंगा जाळला जातो म्हणून मोर्चे काढले जातात.   देशांमध्ये अशा अनेक समस्या आहेत की त्यासाठी आंदोलनं, मोर्चे, उपोषणं करावी लागतात. सत्ताधारी व प्रशासकीय अधि

फक्त दृष्टिकोन चांगला ठेवा …

Image
फक्त दृष्टिकोन चांगला ठेवा … समाजामध्ये चांगल्या गोष्टी खूप काही आहेत, पण त्या हल्ली अदृश्य होत चालल्या आहेत. एकूणच काय तर प्रत्येक व्यक्तीचा मानसिक दृष्टिकोन हा एकमेकांविषयी बदलत चाललेला आहे. असे आढळून आले.   यामध्ये बदल घडवायचा तरी कसा ? हा मोठा यक्ष प्रश्न. यावर उपयोजना ही स्वतःच करावी लागेल. समाजामध्ये काम करत असतांना “ लोक काय म्हणतील ” ? या तीन शब्दामुळे हिम्मत असून सुध्दा पुढचं पाऊल उचलायला अनेकजण घाबरतात. व त्याची प्रगती तिथेच खुंटते. प्रत्येकाने जीवन जगताना दृष्टीकोन बदलला पाहिजे. ज्या क्षणाला आपण आपला दृष्टिकोन बदलू त्या क्षणापासून आपला व समाजातील प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन बदललेला असेल. प्रत्येक व्यक्ती हा प्रामाणिक असतो, फक्त त्याचे विचार प्रामाणिक असायला हवे. प्रत्येक व्यक्ती हा बुद्धिमान असतो, पण त्याच्या अप्रामाणिक विचारशक्ती मुळे तो त्याच्या बुद्धीचा आवश्यक तेवढा वापर करत नाही. म्हणजे तो त्याचा नकारात्मक दृष्टिकोन बदलायला तयार नसतो, त्यामुळे तो माणूस वाईट आहे असा समज समाजामध्ये होतो. ज्या क्षणाला त्या व्यक्तीने त्याचा दृष्टिकोन बदलला व विचार प्रामाणिक करायला स