Posts

Showing posts from November, 2017

चला पत्रकारितेवर बोलू काही ! ...

Image
चला पत्रकारितेवर बोलू काही ! ... रात्रीचा दिवस करून समाज हितासाठी जनतेची सेवा करण्यासाठी, एक पाऊल जनतेच्या हितासाठी, आपल्या धारदार लेखणीने प्रहार करून अन्यायाला वाचा ङ्गोडणारा झुंजार पत्रकार, निर्भिड पत्रकार, खरतर पत्रकारितेची व्याख्या काही वेगळीच आहे १००% पारदर्शक स्वच्छ पाण्याप्रमाणे त्याचा स्वभाव, प्रत्येक घटकाला समान न्याय आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजासमोर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आरशाप्रमाणे सर्व बाजूंनी कायद्याच्या चौकटीत राहून तारेवरच्या कसरती प्रमाणे काम करावे लागते. पत्रकार हा दिवस पहात नाही, रात्र पाहत नाही, काट्याकुट्यांचा रस्ता पाहत नाही, संकटांना तोंड देत देत समाजाला न्याय देण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य देऊन समाजासमोर सत्य ठेवतो. या सत्यासाठी या पत्रकाराला कसा संघर्ष करावा लागतो याचा विचार कोणीच करत नाही ? पत्रकारांचा संघर्ष म्हणजे वंचित घटकांसाठी, समाजात होणार्‍या अन्यायाला वाचा ङ्गोडण्यासाठी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राजकारणातील, समाजकारणातील दोन्ही बाजू जनतेचे प्रश्‍न त्यांच्यापुढे ठेवण्यासाठी अथक संघर्ष करावा लागतो. पत्रकार बांधवांना काय सम

राज्यात अपघातांचे प्रमाण काही कमी होता होईना ! ...

Image
राज्यात अपघातांचे प्रमाण काही कमी होता होईना ! ... महाराष्ट्र राज्यामध्ये अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. या गंभीर विषयाला राज्य मंत्रिमंडळामध्ये व शासन दरबारी वाचा फोडायला कोणीच तयार होताना दिसत नाही. दिवसेंदिवस होणाऱ्या अपघातांमध्ये सर्वसामान्य जनता, निर्दोष बालके यांची हत्याकांडं आपल्याला पाहावयास मिळत आहेत. या अपघातांवर तोडगा काढायचा कधी ? असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आहे. अपघात कशामुळे होतात ? त्याची कारणं काय आहेत ? या विषयाकडे जरा स्वतःचा प्रश्न असल्याप्रमाणे पाहिल्यास तोडगा नक्कीच निघेल व अपघातांचे प्रमाण आपोआप कमी होण्यास नक्कीच मदत होईल यात तिळमात्र शंका नाही.  राज्याचे परिवहन मंत्री आश्वासनांचं नेहमीच गाजर देतात. त्यांना कोणी फोन केल्यास ते सांगतात अपघात कमी करण्यासाठी आम्ही आमचे वतीने सर्व प्रयत्न करत आहोत असे बोलण्यात येते, त्यात वाहतूक प्रशासन हेसुद्धा तेवढेच जबाबदार आहे. हल्ली तर राज्य परिवहन मंडळाच्या बस यांच्या अपघाताचा आलेख उच्च स्तरावर आहे. बसचा अपघात होण्याची कारणे पाहिली असता सध्याचे बस चालक हे तरुण वयातील असल्यामुळे भरधाव बस चालवणे, ओव्हरटेक करणे

माणुसकी हरवलेला माणुस ...

Image
माणुसकी हरवलेला माणुस ... माणसाच्या शरीराचा विचार केल्यास त्याच्या शरीराला चालना देणारा मेंदू हा सर्व प्रक्रियांना जबाबदार असतो . त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची नियंत्रण व्यवस्था ही मेंदूद्वारे चालते . समाजामध्ये वावरत असतांना या मेंदूचा कोणत्या ना कोणत्या घटकाची संबंध येतोच . या मेंदूचे लक्ष सकारात्मक व नकारात्मक आहे हे कळते . काहीसं माणुसकीचा माणुसकीच्या शब्दांमध्ये बेरीज - वजाबाकी होतेच , परंतु माणूस या मेंदूचा उपयोग निगेटिव चालना देण्यासाठी जास्त वापरतो . या निगेटिव पावरचा समाजामध्ये विपरीत परिणाम होणारच . स्वतःचे अस्तित्व टिकवायचं की घालवायचं हे या मेंदूवर अवलंबून असते . आपल्याकडे या मेंदूचाच फारसा प्रमाणामध्ये दूरुपयोग होताना दिसतोय . आपल्या देशाची संरक्षण व्यवस्था ही काही प्रमाणात या मेंदूसारखे काम करत असते . अर्थात पोलिस यंत्रणा . मला पोलिस यंत्रणेच्या चांगल्या कामाबद्दल बोलायचे असल्यास नक्की अभिमान वाटेल पण नकारात्मक गोष्टींचा लेखाजोखा जर पाहिला तर शरमेनं मान