Posts

Showing posts from October, 2016

फडणवीसांचे ‘राज’कारण, अन् विसरुन गेले कोपर्डी प्रकरण ?

Image
फडणवीसांचे ‘राज’कारण, अन् विसरुन गेले कोपर्डी प्रकरण ? कोपर्डी प्रकरणामुळे अख्खा महाराष्ट्रच नव्हे तर अख्खं जग आजही हळहळ व्यक्त करत आहे. जे झाले ते फार फार चुकीचे, विकृत, अमानुष, अपनेक्षित घडले. आरोपी पप्पू शिंदे या निर्लज्ज, लिंगपिसाट, कलंकीत, विकृत बुध्दीच्या नालायकाने हे अघोरी कृत्य करुन या लोकशाहीचा डंका वाजवणाऱ्या देशाला पुन्हा एकदा सांगून दिलंय कि बाबानों या देशात स्त्री ही सुरक्षित नाहीच. आज चार महिने उलटून गेले मात्र अरोपी पप्पू शिंदेला ना न्यायालय कठोर शिक्षा देऊ शकले, ना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस याबाबत निर्णय घेऊ शकले. मोदी लाटेमध्ये अनावधानाने निवडणुन व अनपेक्षित सत्ता मिळालेल्या या सरकारला चार महिने जाऊनही बलात्कार करुन निघृण खुन करणाऱ्यांना आरोपींना शिक्षा देण्यासाठी आदेश काढायला किंवा त्या विषयाकडं ढुंकूनही पहायला वेळ नाही. अन् कोण कुठला तो ‘करण जोहर’ पाकिस्तानी कलाकारांना घेऊन सिनेमा बनवतो, आपल्या राज्याचे जबाबदार मुख्यमंत्री व आश्वासनांचा पाऊस पाडणारे नेतेमंडळींना बरोबर घेऊन एका वाडयावर घेऊन ‘सेटलमेंट’ करतात ? जणू काही मानवाच्या मुलभूत गरजांची पूर्तताच होणं

‘करण जोहरचा’ हा स्टंट तर नव्हता ना ?

Image
‘करण जोहरचा’ हा स्टंट तर नव्हता ना ? हल्ली राजकारण कशातही आहे पण बॉलीवुड फिल्म इंडस्ट्रीतही ‘राज’कारण होऊ लागल्याने राज्यातील तसेच देशातील सिनेमाच्या चाहत्यांना व सुजाण नागरीकांना ‘करण जोहरचा हा स्टंट तर नव्हता ना ?’ हा प्रश्न का भेडसावू नये ? हल्ली एखाद्या गोष्टीचा बाऊ करण्यासाठी किंवा एखादी सहज बाब बेडकाने फुगवविलेल्या पोटासारखी मोठी करुन दाखवण्याचा खेळ अनेक जण करु पाहतात व करतातही. मग त्यात ‘राज’कारणी सवंगडयांचा पाठीवर हात किंवा मदत घेतली जाते. हे सत्य आहे. मात्र ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याआधीच महाराष्ट्र नवनिर्मान सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या मनसे कार्यकर्त्यांना दिलेल्या आदेशावरुन दोन दिवसाखाली पाकिस्तानी कलाकरांविरोधी आंदोलन झाले होते. इलेक्ट्रॉनिक मिडीयाने हे प्रकरण तीव्र उचलून धरल्यामुळे का होईना याची चर्चा जगभर पहावयास मिळाली. या प्रकरणाचे पडसाद देशपातळीवर जाऊन पोहोचले. पाकिस्तान व भारत या देशांमधील वैर वाढण्यात ही भर काही कमी नाही. पण ‘राज’कारणात काय आणि युध्दात काय सर्वकाही माफ असतं, खरंतर असंच म्हणाव लागेल. यापूर्वी ‘मनसेचं

‘मनसे’चं आंदोलन योग्यच !

Image
‘मनसे’चं आंदोलन योग्यच ! जेंव्हा देशहिताचा प्रश्न ऐरणीवर येतो तेंव्हा याच्याशी आपले काही देणे घेणे नाही असा मनोमनी निश्चय करणारे भारतीय आपण. देशाच्या सरहदीवर लढता लढता जवान शहीद होतो तेंव्हा एक दिवस टी.व्ही. चॅनल पहात पहात हातातल्या रिमोटने हळहळ व्यक्त करत चॅनल बदलणारे आपण. अरे, खुप वाईट झालं ! असा डायलॉग चिकटवून काहीच दु:ख न वाटता किंवा त्यासाठी काही उपयायोजना न करणारे सत्ता हातात असून (सत्तेवर कोणीही असो) हतबल झाल्यासारखे षंढ. स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या दिवशीच देशहिताचा पुळका असल्याचं ढोंग करणारे आपण. त्या दिवशी देशभक्तीपर गीतं ऐकुन दिवसभर स्वत:, इतर व ऐमेकांना देशासाठी बलीदान दिलेल्या क्रांतीकारकांची चढाओढीनं भाषणं देणारे, ऐकणारे आपण. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या अल्पावधीतच मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य करणारा देश हिताच्या दृष्टीने विचार कराणारा (राजकारणाचा यात काहीही संबंध नाही) पक्ष. जेव्हा देशपातळीवर देशातील वाद चालू असतांना तो कोण ‘करण जोहर’ त्याला पाकिस्तानी कलाकारांचा पुळका येतो. भारतातील कलाकारांना मिळणाऱ्या संधी वर्षानुवर्ष कुकर्मी पाकिस्तानातील व वेळोव

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

Image
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय ! शब्दांनी करतो प्रहार, धाडसी झुंजार, समाजसुधारणा निर्धार, विचारांत बळ शब्दांना धार, सुरक्षित समाजाचा शिल्पकार, झेप गरुडाची नजर सभोवार, असत्याचा करतो संहार, हाती लेखाणी तलवार. अशा या शब्दअलंकाराने लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची म्हणजेच पत्रकार या व्यक्तीमत्वाची व्याख्या तोंड भरुण केली तरी कमीच आहे असं मी नक्कीच म्हणणे. समाजासाठी हा सत्याचा आरसा समजला जातो. लोकांचा प्रचंड विश्वास असणारं प्रतिभावंत व प्रामाणिक उदाहरण म्हणून पत्रकारीतेकडं पाहिलं जातं. वृत्तपत्रविदया अवगत करण्यासाठी लेखणी तलावार व शब्दांची ढाल करुन अन्यायाच्या विरोधत लढण्यासाठी सज्ज असलेला पत्रकार. भल्याभल्यांना आपल्या शब्दांनी व परखड लेखणीच्या माध्यमातून चारीमुंडयाचित करणारा पत्रकार. पण हल्ली पत्रकरीता क्षेत्रामध्ये काही उणीवा जाणवू लागल्या आहेत. पत्रकारीतेला एक वेगळंच वळण लागलेलं पहावयास मिळत आहे. जनतेच्या मनात पत्रकारीतेबद्दल ज्या भावना होत्या त्या भावना बदलल्याचं कुठंतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जाणवत आहे. गेल्या काही वर्षापूर्वी पत्रकाराची जी छाप होती ती आज राहिली नसल्याचे

खरंच भारत माझा देश आहे ?

Image
खरंच भारत माझा देश आहे ? प्रिय वाचकहो हा विनोद नाही, हा अपमान नाही, हा देशद्रोह नाही किंवा हा मुद्दाम केलेला खोडसाळपणा नाही कारण हा प्रश्न तरुणाईला खरंच सतावतोय. कारण भारत असा एकमेव देश आहे जिथं ‘आरक्षण’ हा भस्मासुर राहतोय. कोणाला आरक्षण असो वा नसो माझा त्या गोष्टीला अजिबात विरोध नाही किंवा समर्थनही नाही. आरक्षणाच्या बळावर जे कुटील कारस्थान, राजकारण, पिळवणूक, फसवणूक, शोषण, दादागिरी, माज या सर्व गोष्टीचा मात्र माझा तीव्र विरोध आहे. राजकारणात आरक्षणाला विरोध केला किंवा आरक्षण रद्द करा असं म्हटलं की लगेच गुन्हा दाखल होतो, प्रतिकात्मक पुतळा दहन करुन निषेध व्यक्त होतो, मोर्चे निघतात, उपोषणनं होतात, आरोप प्रत्यारोप होता हे फक्त फक्त राजकारणतच लागू होणाऱ्या बाबी आहेत. हे चालायचंच, असो, पण मला या सर्व विषयावर चर्चा न करता मुळ विषयावर प्रकाशझोत टाकायचा आहे. मी हा प्रश्न मुद्दाम पोखरुन काढलाय. या स्पर्धेच्या युगात भारत देशाचे भवितव्य घडवणारी युवा पिढी आरक्षण या भानगडीमुळे संभ्रमात व संकटात सापडली आहे. प्राथमिक शिक्षण ते उचच्‍ शिक्षण घेत असतांना जातीपातीमुळे शिक्षणावर होणारा खर्च हा सारखा

शासनाची शिष्यवृत्ती योजना म्हणजे ‘रात्र थोडी सोंगे फार’

किचकट ऑनलाईन प्रक्रियेमुळे पाल्यांसोबत पालकही हैराण भारत सरकारच्या विविध शासकिय शिष्यवृत्ती योजना आहेत. महापुरुषांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, इमाव, ओबीसी (SC, ST, SBC, OBC) या प्रवर्गातील लाभार्थी विदयार्थ्यांना देण्यात येते. जवळपास गेली सहा वर्षांपासून ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे. पूर्वीपेक्षा जलद विदयार्थ्यांना या सवलतीचा लाभा घेता यावा यासाठी ही खास उपायोजना शासनाने निर्णय घेऊन आमलात आणली. ऑनलाईन सेवा सुरू झाली झाली ही अत्यंत चांगली व भारत सरकारच्या प्रगतीमध्ये भर टाकणारी बाब आहे. यामध्ये वसतीगृह प्रवेश प्रक्रिया, भारत सरकार शिष्यवृत्ती, फ्रीशिप, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, सैनिक शाळा शिष्यवृत्ती, विदयावेतन योजना, परराज्यात शिकणाऱ्या विदयार्थ्यांसाठी योजना, नववी व दहावी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, सफाई व्यवसाय / का.का.प शिष्यवृत्ती योजना अशा विविध योजनांच्या शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण

निर्भिड ब्लॉग

नमस्कार वाचक मित्रहो , वाचकप्रिय निर्भिड ब्लॉगला आपण मनापासून भेट दिली , त्याबद्दल आपले निर्भिड ब्लॉगवर निर्भिड स्वागत . लेखक हा समाजाचा आरसा आहे ,   हा ब्लॉग निर्माण करण्यामागचा हेतू असा काही विशेष नाही किंवा त्यात वेगळेपण असे काहीच नाही . ब्लॉग निर्मितीचा हेतू फक्त एवढाच की , समाजातील न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या घटकांवर अन्यायाविरोधात प्रखर , रोखठोक , निर्भिडतेनं लिखाण करायचं . आजतागायत तसं करतही आलो आहे . कोणत्याच एका बाजूने मांडणी न करता समाजासमोर दोन्ही बाजू मांडण्याचा मी प्रामाणिकपणे आजवर प्रयत्न करत आलो आहे आणि यापुढेही करणार आहे . आपण ब्लॉगला भेट दिली . आपल्या सूचनांचे , टिकांचे व तक्रारींचे नेहमीच स्वागत असेल . यात शंक्काच नाही . देशभरामध्ये सामान्य , शेतकरी , शेतमजुर , विद्यार्थी , कामगार , गोरगरीब नागरीक व इतर वंचित घटक अन्यायाला बळी पडत असल्याचे माझ्या अभ्यासादरम्यान निदर्शनास आले . तसेच ही सत्यता माझ्याकडून पडताळली गेली . तेव्हा मी निशब्द झालो व भयान वास्तव