Posts

Showing posts from September, 2018

पक्ष काढणार म्हणे …

पक्ष काढणार म्हणे …   महाराष्ट्रामध्ये पक्ष नावाच्या टपऱ्या दिवसेंदिवस वाढत आहेत. हा लोकशाही व्यवस्थेला बाधक परिणाम ठरत आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेले असल्यामुळे त्याच स्वातंत्र्याचा वापर करून लोकशाही मधल्या समाजाची दिशाभूल करून पक्ष नावाची नवीन टपरी चालू करून सर्वसामान्य जनतेची लूट करू पाहणारे, लूट करणारे, लूट केलेले असे अनेक टपरी संस्थापक आपल्या महाराष्ट्राच्या माती मध्ये अजूनही ताठ मानेने जगत आहेत. तसेच असे डोमकावळे संस्थापक यांच्या नावाने राज्यभर गडगंज संपत्ती जमा आहे. ज्याला आपण घबाड असं म्हणतो. ते घबाड येणाऱ्या सात पिढ्या खातील एवढी संपत्ती यांनी जनतेची दिशाभूल करून पक्ष नावाच्या टपरी च्या माध्यमातून कमावलेली आहे ती कमावलेली संपत्ती चांगल्या मार्गाने कमावली आहे असे कागदोपत्रावर दाखवून राज्यातील सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम या पांढऱ्या पोशाखातील चोरांनी केली आहे. याठिकाणी पक्ष नावाच्या शब्दाला मुद्दाम टपरी हा शब्द वापरला आहे त्याचं कारण म्हणजे कोणत्याही एखाद्या शहरांमध्ये आपण गेलो असता पावला दोन पावलावर चहाची, पान टपरी इ. यांची मांडणी केलेली

बेरोजगारी इथली संपत नाही ...

Image
बेरोजगारी इथली संपत नाही ... देशामध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले असून, बेरोजगारी सारखी मोठी समस्या युवकांच्या जणू पाचवीलाच पूजली आहे. येथील प्रशासन व सत्ताधारी आश्वासनांचे गाजर व कागदी घोडे नाचवण्याशिवाय काहीच करत नाही. दरवर्षी कित्येक डॉक्टर, इंजिनियर, पदवीधारक पदवी घेऊन रोजगार मिळवण्यासाठी बाहेर पडतात. परंतु शेवटी त्यांच्या हाती नैराश्याशिवाय काहीच मिळत नाही. खाजगी नोकरी असो व शासकीय नोकरी येथील रिक्त पदांच्या एका जागेसाठी दहा हजार अर्ज प्राप्त झालेले असे बरेच उदाहरणं आहेत. देशांमध्ये एवढी मोठी गंभीर समस्या असतांना, प्रशासन व सत्ताधारी हातावर हात ठेवून गप्प बसले आहेत. एकमेकांवर टिका करण्यात सत्तेतले पाच वेर्षे कसे निघून जातात यांचं यांनाच कळत नाही. बघ्यांची भूमिका घेऊन बसलेले सत्तेमध्ये येताना विरोधकांच्या नाकर्तेपणाचे भांडवल करून सत्तेवर येतात व शेवटी ‘जैसे थे’ असाच प्रकार घडत असल्यामुळे कित्येक तरुणांना रोजगार मिळत नाही त्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलले जात आहे. भारत महासत्तेची स्वप्न पाहतोय. भारत मंगळवार यान पाठवून तेथे शोध मोहीम सुरू करून वेगवेगळे शोध लाव

कर्तव्यापासून दूर गेलेली पत्रकारिता

Image
कर्तव्यापासून दूर गेलेली पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ, लोकशाहीचा आरसा ज्याला दर्पण म्हणतो, त्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला लोकशाहीचा व कर्तव्याचा हल्ली विसर पडल्यासारखं वाटतंय. त्याचं कारण म्हणजे एक पाऊल जनतेच्या हितासाठी, अशी शपथ घेतलेल्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आपण कशा प्रकारची पत्रकारिता, कशाप्रकारचे कर्तव्य बजावतोय, याचाच जणू विसर पडला आहे. उगाच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर तोंडसुख न घेता खरंच त्याच्याकडून काही नकळत होत चुकांसाठी हा शब्दप्रपंच. अगदी थोडक्यात आणि स्पष्ट. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला देशात एक वेगळे स्थान आहे. त्याची एक वेगळीच ओळख आहे. ती ओळख निर्माण झाली ती त्याच्या कर्तव्यामुळे, तो त्या क्षेत्रात कार्य करत असल्यामुळे, लोकशाहीचा अर्थ आरसा, दर्पण. त्याच्याकडे पाहिलं की अन्याय झालेल्याला न्याय नक्कीच मिळणार आहे याचं समाधान असतं. त्याला मिळणारे समाधान हे पत्रकारितेत कार्यरत असलेल्या स्वच्छ पाण्याप्रमाणे, पारदर्शी कर्तव्य करणाऱ्या पत्रकाराकडून मिळते. पण हल्ली याची व्याख्या काही वेगळी झाली आहे, हा खरंच चिंतन करण्याचा विषय आहे. ज्या गोष्टी समाजाला पत्रकारांकडून