मुख्यमंत्री यंदा पांडुरंगाच्या दर्शनाला पायी येणार ? दर्शनही वारकऱ्यांसोबतच घेणार ?
मुख्यमंत्री यंदा पांडुरंगाच्या दर्शनाला पायी येणार
?
दर्शनही वारकऱ्यांसोबतच घेणार ?
वारकऱ्यांच्या
वर्दीत राजकिय गर्दी करावीशी म्हणतो त्याशिवाय परिवर्तनाची सर्दी झाल्याशिवाय राहणार
नाही. भाग एक मध्ये पांडुरंगाच्या प्रथम दर्शनाच्या व पुजेच्या मानाची प्रथा असावी
की नसावी व कोस कोस वारकरी राज्या परराज्यातून दर्शनासाठी येतो व दरवर्षी मुख्यमंत्री
मात्र लाल दिव्याच्या गाडीत (यंदा अपवाद) किंवा चार पात्याच्या फडफड करत हेलीकॉप्टरमधून
येऊन दर्शनाचा व पुजेचा पहिला मान पटकावतात याविषयी होता. हा मान केव्हापासून दिला
जातो ? का दिला जातो ? याचा इतिहास काय ? किंवा ही पुजा मुख्यमंत्री यांच्या हातूनच
का ? असे बहुत मार्गी, विचारी व प्रश्नांनाही प्रश्नात टाकणारी काही प्रश्न आहेत, हे
सहाजीकच आहे, परंतू याकडे न जाता, साधा आणि सरळ प्रश्न असा आहे की, खरंच यंदा परिवर्तन
होईल का ? कोस कोस पायी महिनेच्या महिने पायी दिंडीमध्ये कशाचीही तमा न बाळगता वारकरी
विठुरायाच्या दर्शनाला येतो, भक्तीच्या भुकेल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांगेतच
उभा राहून बारा बारा वेळ देऊन तास दर्शन घेऊन तृत्प होऊन परतीच्या वाटेवर निघतो.

कदाचित पांडुरंगाच्या पहिल्या पुजेचा मान मुख्यमंत्र्यांच्या पदाला, खुर्चीला असेलही
मग त्यावेळी विराजमान मुख्यमंत्री कोणीही असो, मात्र प्रथेमध्ये थोडासा पुरोगामी विचाराने
बदल झाला तर नक्कीच अच्छे दिन कडे वाटचाल सुरू झालीय असेही या ठिकाणी आवर्जुन नमुद
केलेले बरे वाटते, जसे व्हीआयपी पणा सोडून लाल दिव्याची एैसी की तैसी करुन सरकारने
खरंच साधेपणाचं व परिवर्तनवादी विचाराचं आचरण करायला सुरूवात केली आहे हे प्रत्येकाला
मान्य करावेच लागेल. स्वप्नं पडलंय खरं पाहुया खरं होतंय का ते पुढील भागात …
- शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com
Comments
Post a Comment