Posts

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

Image
'यशाला' शॉर्टकट नाहीच ! जीवनात यश मिळवण्यासाठी जो तो धडपड करत असतो, आपल्या जीवनाचं ध्येय गाठण्यासाठी, यशाची शिखरं गाठण्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळी प्रगतीची मार्गं शोधून त्या माध्यमातून यश मिळवायचं असतं ते त्याला मिळतं सुधा. पण काही यश मिळवण्यासाठी एकाग्र बुध्दीमत्ता न वापरता, कष्ट न करता, आयतं मिळवं या अपेक्षेने कष्ट, मेहतन करत नाहीत व जीवनात नेहमी शॉर्टकटच्या शोधात असतात पण महापुरूष, संतांनी, साहित्यीकांनी एका ओळीत सांगितले आहे की, यश मिळवायचे असेल तर त्याला कष्टाशिवाय, मेहनतीशिवाय व एकाग्र बुध्दीमत्तेचा वापर करुन व्यवस्थापन केल्याशिवाय दुसरा तिसरा कोणताही पर्याय नाही. पण ते लोक ऐकायला मुळीच तयार होत नाहीत. शेवटी त्यांच्या पदरी राहतं ते अपयश. अशा निवडक लोकांच्या आयुष्यात त्यांना असं वाटतं की, आपल्या  जीवनातील बदलासाठी एखादा चमत्कार घडावा व आपलं जीवनंच बदलून जावं, गरीबी ही प्रत्येकाच्या आयुष्यात असते. माणसांच्या गरजेनुसार प्रत्येकाची गरीबी ठरलेली असते. पण ती बदलणे आपल्या हातात आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती संगणक क्षेत्रातील गॉड फ ादर बिल गेटस म्हणतात, जर तुम्ही गरीब ...

अपघातांसाठी ...

Image
अपघातांसाठी ... ऍक्सीडेंट झाला, अपघातात मृत्यू, चिरडले, उडवले, जागीच ठार, असे वृत्त वर्तमानपत्राचे पान उघडले की एकापेक्षा अनेक बातम्या आपण रोज वाचतो, हळहळ व्यक्त करतो, विचार करतो, वाईट वाटून घेतो, अपघात कसा झाला असेल यावर चार पाच मिनिटे चर्चा होते, काय करावं ? असंही म्हणतो आणि वर्तमानपत्र ठेवून आपण पुढील कामाला निघून जातो. पण कोणी कधी अपघात होवू नये यासाठी कोणीच काहीच करत नाही. करत नाही म्हणजे करतच नाही, अपघात होवू नये यासाठी ठोस भूमिका घेणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे, देशात लोकसंख्या एवढी अवाढव्य आहे की, रोज किडयामुंग्यांसारखी माणसं मरतांना आपणा पाहतो, पण हे थांबणार, कधी याला आळा बसणार असे विचार प्रत्येकाच्याच मनात आहे, पण हे सगळं आपण स्वत:च थांबवू शकतो ! प्रवासाला जातांना नेहमी आपला, आपल्या परिवाराचा व समोरच्या व्यक्तीसह त्याच्या परिवाराचा आपुलकीने विचार करायला हवा. प्रवास करतांना घाई करणे शक्यतो टाळावी, कितीही घाई केली तर ती संकटात नेणार आहेच त्यामुळे विचार पुर्वक पाउल उचलावे, मदयपादन करुन वाहन चालवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे हे माहित असून सुध्दा काही अतिउत्साही व अत...

जोडप्यांचे वाद ...

Image
जोडप्यांचे वाद ... हल्ली विवाह प्रेमसंबंधातूनच जास्त होत आहेत. अरेंज मॅरेजला फ ाटा देत आता लव्ह मॅरेज करण्याकडे अनेक तरुण तरुणींची पसंदी असल्याचे समोर आले आहे. शाळा, कॉलेज जीवनापासूनच एकमेंकांविषयी असलेले आकर्षण हे जीवनातील जोडीदारात रुपांतर केंव्हा होते हे त्यांचं त्यांना सुध्दा कळत नाही. परंतू या सर्व प्रवसात संकटं मात्र लाखोंमध्ये भेटतात. त्यांना सामोरे जावून जावून विजयाचा कंदील लागतो. कधी वय, जात, तरुणाकडील कुटूंब तर कधी तरुणीकडील कुटूंब यांच्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. कधी आत्महत्येचाही मार्ग अवलंबला जातो. तर कधी पळून जावून आपला संसार थाटला जातो. पण हल्ली प्रेमसंंधातून वा अरेंजमॅरेज मधून झालेल्या विवाह संसारामध्ये पती पत्नी वाद हा मोठयाप्रमाणात पहावयास मिळतो. स्त्रीयांच्या मनात आणि पुरूषांच्या मनात काय आहे हे एकमेकांना समजायला वेळेअभावी व आपसांत विचारांच्या देवाणघेवाणीचा अभाव या कारणाने जोडप्यांतील वाद हा गगनाला भिडला आहे. हेवे देवे, आवडी निवडी, एकमेकांना समजून न घेणे यांमुळे दोघांनाही वाद या वादग्रस्त व्युहाला सामोरे जावे लागते. काही वेळांमध्ये वाद मिटतोही कारण सांसराच...

तरीही आत्महत्या थांबेनात …

Image
तरीही आत्महत्या थांबेनात शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वच घटकांनी संकटाची दारे उघडी करुन ठेवली आहेत. खरा शेतकरी, शेतमजुर बिचारा लाभापासून वंचित तर सालो साल झाली आहेच. परंतू दैनंदीतन जीवनातील संकटं काही पाठ सोवडवेनात. शेतकरी गरीब का असतो ? या प्रश्नाचं उत्तर का शब्दा काढला की लगेच मिळतो. कारण शेतकरी हा गरीबच असतो. देश कृषीप्रधान अन साऱ्या देशाला जवगवणाराच आज भिकारी झाला आहे. शेतकऱ्यांच्या बाजून निवडणुका आल्यावरच सर्वजन त्यांच्या समस्यांचं भांडवल करुन खुर्च्या बळकावतात. शेतकरी विवंचेने दाद मागयला गेल्यावर त्याला त्याच्या पार्श्वभागावर लाथ मारुन मोकळया हाताने परत पाठवण्याची मालिका पांढऱ्या कपडयातील माणूसकी संपलेली गटारातील किडे करत असतात. अंह ! हा शब्दा सुध्दा खुप वजनाचा आहे. तो त्यांना वापरणेही योग्य नाही. कारण माणसातला माणूस आज संपलाय. तो कुठेतरी पैशांना पैसा जोडण्यात गुंतलाय. अन असा गुंतलाय की दुसऱ्याच्या मुंडीवर पाय ठेऊन, इतरांचे नुकसान करुन, गोलमाल करुन, अवैध मार्गाने, भ्रष्ट परंपरेचाच अवलंब करुन पैसा जोडण्याची तयारीला लागला असल्यानेच शेतकऱ्यांच्या नशिबी शेवटी गोटाच आहे. शेतकऱ्यांना ...

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच प्रहार ?

Image
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच प्रहार ? खबरदार मोंदींवर टीका कराल तर, अशा शब्दात सायबर सेलने पत्रकार बांधवांना नोटीसा पाठवल्या. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असल्यामुळे भाजप सरकार पत्रकारांना एवढे घाबरते व दुसरे म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या चमत्कार इथे पहावयास मिळतो. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामुळेच आज देश सुव्यवस्थित टिकून आहे, शासनाची व्यवस्था टिकून आहे. शासन दरबारी होणाऱ्या बदलाचा विकासाचा, भ्रष्टाचाराचा वा इतर बाबींचा आढावा जनता दरबारी ठेवण्याचं काम लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार करत असतो. मात्र भाजप सकाराच्या काळामध्ये याच पत्रकाराच्या लेखणीवर दबाव आणण्याचे षडयंत्र वापरले जात असून लोकशाहीवरच प्रहार करणयाचं काम या सत्ताधाऱ्यांनी केला आहे. निश्चितच या घटनेचा तीव्र निषेध आहेच. परंतू अशा घटना होत असतील आणी जनता मात्र हातावर हात ठेवून बसत असेल तर एवढे दिवस, दिवसाचा, रात्रीचा, उन, वारा, पाउसाची तमा न बाळगता अहोरात्र पत्रकारांनी जनतेची सेवा केली त्याबाबत जनता मात्र काहीच बोलत नसून कोणात्याही प्रकारच्या अडचणीत सापडलेल्या पत्रकार बांधावांच्या बाजूने उठाव करत नसल्याने पत्रकार ब...

जातीवरुन लायकी ठरवणारा देश !

Image
जातीवरुन लायकी ठरवणारा देश ! घरातून बाहेर पडलं की, प्रत्येकाला समाजात वावरंत असतांना समाजामध्ये नवनविन माणसं भेटतात, नविन ओळख निर्माण करायची असेल तर प्रथम आपलं नाव सांगावं लागते, अर्थात स्वत:चा अल्पसा परिचय दयावा लगतो. ही खूप सामान्य व गंभीर बाब नसली तरी त्यापासून निर्माण होणाऱ्या भयावह संकटांना प्रत्येकाला सामोरे जावेच लागते. त्यात आपला देश अठरा पगड जातीचा, अन अठरा विश्व दारिद्रयात असला तरी, इतर देशांपेक्षा गरीब देश म्हणून ओळखला जातो व लोकसंख्येच्या बाबतीत सध्या तरी दुसरा क्रमांक लगतोय, तो पहिला ही होईल कारण लोकसंख्या एवढी झपाटयाने वाढत आहे की, त्याचा परिणाम हा सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाल्याशिवाय रहात नाही. यंदाच्या वर्षी तरी देशात अमुलाग्र बदल होईल. सत्तापरिवर्तन केल्यास देश खरंच स्वतंत्र होईल. भेदभाव, जातीव्यवस्था, धर्मव्यवस्था, श्रेष्ठ, कनिष्ठ, गरीब श्रीमंत, हे असणारे भेद कमी प्रमाणात पहावयास मिळतील. पण नाही ! हे काही होणारच नाही, सक्षम पर्याय मिळावा,  याला काही मर्यादा असावी.  पण तेही नाही ! असो, असं मी कदापीही म्हणणार नाही. कारण शंभर टक्के प्रबोधन करायचं आणि...

सावधान ! आपली मुलं सैराट तर होत नाहीत ना !

Image
सावधान !  आपली मुलं सैराट तर होत नाहीत ना ! धावपळीच्या जीवनात व स्पधेर्र्च्या युगात टिकूण राहण्यासाठी पालकांना अतिशय कष्टयातनेतून आपला उदरनिर्वाह करावा लागतो. पाल्यांच्या शिक्षणासाठी पैसाच लागतो म्हणून पोटाला मारुन तारेवरची कसरत करावी लागत आहे. हे चालू असतांनाच हल्लीची तरुन पिढी पार बिघडून वाया चाललेली दिसून येत आहे, आपली संस्कृती, पालकांचे संस्कार, वडीलधाऱ्यांचा मान राखणे जणू हे सर्व विसरुनच गेले आहेत असंच वाटतं. कधी कधी तर समोरुन येणारा मुलगा आहे की, मुलगी हे ओळखणंच फार कठीण झालं आहे. त्याचं कारण म्हणजे आजकालची फॅशन, अंगप्रदर्शन वगैरे वगैरे. राहणीमाना सोबतच वागण्यातही मोठा परिणाम झालेला दिसतो. कधी काळी महिला वर्गाला चूल आणि मूल यापुढे काहीही करु दिलं जात नव्हतं. मात्र लोकशाही राज्यात स्वातंत्र्याचा एवढाही दुरूपयोग कधी कुठं झाला असेल तर तो फक्त भारतातच. स्वातंत्र्य असावं, याला विरोध नाही पण स्त्री वर्गाने व पुरूष वर्गाने त्याचा वापर चांगल्या कामासाठी केला तर स्वत:साठी व देशहीतासाठी व आपल्या पालकांसाठी वरदान ठरेल. गेल्या काही वर्षांपासून अल्पवयीन प्रेमप्रकरणे, घरातून ...

व्हाट्सअँप, फेसबुकमुळे दूर गेलेल्या मित्रांना लुडोने एकत्र आणले, पण, लुडोच्या वेडया नादापाई मैत्रीचं नातं जुगारात गुंतले.

Image
व्हाट्सअँप, फेसबुकमुळे दूर गेलेल्या मित्रांना लुडोने एकत्र आणले, पण, लुडोच्या वेडया नादापाई मैत्रीचं नातं जुगारात गुंतले. चहाच्या टपरीवर, भिंतीच्या कठडयावर, रस्त्यांच्या दुभाजकांवर, बगीचामध्ये, मिळेल त्या ठिकाणी दोन मित्र किंवा चार मित्रांनी मिळून खेळायचा हा मोबाईल खेळ हल्ली सर्रास पहावयास मिळतोय. जिकडं नजर जाईल तिकडं टाईमपास म्हणून, पैसे लावून अर्थात जुगारच अशा प्रकारे हा खेळ खेळणार मित्र समूह पहावयास मिळतोय. व्हॉट्सॲप, फेसबुक व इतर सोशल मिडीयामुळे मोबाईलमध्ये डोकं घालून एकटं एकटं अनेक ठिकाणी बसलेली मंडळी आपण अनेक ठिकाणी पाहिली असेल. मित्र मित्र एकमेकांच्या शेजारी बसून सुध्दा मोबाईल मधील सोशल मिडीयाच्या अति वापरामुळे एकमेकांकडे पहायला सुध्दा वेळ नव्हता बोलण्याचा प्रश्न तर दूरच. अशा प्रकारे लागलेला नाद आता लुडो  नामक मोबाईल खेळामुळे मैत्रीमधील भिंत आता पार कोसळली असून मित्रांना एकत्र आणण्याचं काम या खेळाने नक्कीच केलं आहे. मात्र या खेळाचे रुपांतर आता मैत्रीच्या नात्यापलीकडं गेलं असल्यामुळे एक वेगळीच भिती निर्माण झाली आहे. कारण हा खेळ आता खेळ राहिला नसून तो आता पैशा...

आधी मन स्वच्छ करा, देश आपोआप स्वच्छ होईल !

Image
आधी मन स्वच्छ करा , देश आपोआप स्वच्छ होईल ! आपल्या देशाचं दुर्देव एवढंच आहे की , आपल्या देशात स्वच्छताविषयी जनजागृती करावी लागते . देशात घाणीच्या पसरलेल्या व बरबटलेल्या शहरांमुळे मानीव आरोग्यावर हानीकारक परिणाम होतोय तरी देशातील अस्वच्छता काही नाहीसं होण्यास तयार नाही . देश स्वच्छ करण्यासाठी अभियान राबवावे लागतात , जनजागृती करावी लागते . ही देशासाठी कौतुकाची नाही तर मान खाली घालण्याची बाब आहे . स्वच्छता बाळगा , कचरा इतरत्र टाकू नका , येथे थुंकू नका , कचरा पेटीचा वापर करा , शौचालयाचा वापर करा वगैरे वगैरे पाटया या देशात लावल्या जातात . हे काम ग्रामपंचायत , नगर पालीका , महानगरपालिका व इतर सबंधीत कार्यालयांना करावे लागते . जिथं करुन नका अशा नावाची पाटी लिहिलेली असते त्या ठिकाणी मुद्दाम आपल्या देशातल जनता तिथं उलट पध्दतीने काही तरी विरोध दर्शवुन विकृती केल्याशिवाय रहात नाही . स्वच्छ भारत अभियानावर आपल्या देशामध्ये कोटयावधी रुपये खर्च होतो . परंतू जनतेला त्याचा काहीही फरक...

किडया-मुंग्यांसारखे मरण नको रे बाबा !

Image
किडया-मुंग्यांसारखे मरण नको रे बाबा ! -देशात दर 4 मिनीटात एक रोड अपघाताचा बळी- वर्तमानपत्र उघडले, टी.व्ही चालू केला, सोशल मिडीयासह विविध माध्यमांमधून देशभरामध्ये अपघाताच्या घटना पहावयास मिळतात. त्या इतक्या भयानक असतात की, पाहिल्यास मन उदास व जमीन पाय ठेवू देणार नाही. रोज किडया-मुंग्यांसारखी माणसं मरतांना आपण पाहतो, वाचतो, ऐकतो व नकळत विसरुनही जातो. पण त्यावर तोडगा काढण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही. नेमके अपघात का होतात व त्यासाठी उपाययोजना म्हणून ठोस पाऊल उचलत नाहीत किंवा एखादा सक्षम पर्याय शोधत नाहीत. देशात रोज किती तरी निर्दोश लोकं या अपघातासारख्या बकासुरास बळी पडतात. कधी समोरचा वाहन नीट चालवत नाही, कधी वाहन चालकच मद्यपान करुन वाहन चालावतो, कधी मोबाईल वर बोलतांना, तर कधी रात्रभर वाहन चालवल्यामुळे पहाटेच्या डुलगी लागल्यामुळे अशा विविध प्रकारचे कारणे अपघात होण्यासाठी पुरेशी आहेत. प्रत्येकवेळी शासनालाच दोष देणं फारसं चुकीचं ठरतं. जीव आपला आहे, शासनाचा नाही हे आपण कुठंतरी पार विसरुन गेलो आहोत. लक्ष आपले वाहन नीट चालवण्याकडे नसून धावपळ, घाई, व लवकर पोहोचणे याकडे जास्त असते. हल्...

प्रसिध्दीसाठी व स्वार्थासाठीच शेतकऱ्यांचा पुळका !

Image
प्रसिध्दीसाठी व स्वार्थासाठीच शेतकऱ्यांचा पुळका ! राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या पार हाताबाहेर गेल्या असल्या तरी शासनाला काही जाग येईना. शेतकऱ्यांना फक्त मदत व कर्जमाफीचे आश्वासन दिले व घोषणा केली, मात्र थेट शेतकऱ्यांच्या पदरात शुन्य इतकी मदत मिळाली आहे. दहा हजार देऊ, कर्जमाफी करु, तत्वत: निकष इत्यादी सर्वांचा शेतकऱ्याला आत विट आला आहे. कधी शेतावरचा बांध न चढलेले, अर्धवटराव, स्वत:ला शेतकऱ्यांचे नेते म्हणवणारे व शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून शेतकऱ्यांचा फक्त स्वप्रसिध्दीसाठी व स्वार्थासाठीच पुळका असल्याचं सोंग करणारे, वर्तमानपत्राच्या व इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या माध्यमातून स्वत:ची प्रसिध्दी करत आहेत. खरंच यांना माहिती आहे का ? की, शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या घरची चुल कशी पेटत असेल, शेतकऱ्यांच्या भावना कधी समजून घेतल्या का? उगाच शेतकऱ्यांच्या  प्रश्नावर लढा देत आहोत असे भासवून शेतकरी नेते म्हणवणारे ढोंगी पुढाऱ्यांनी आपली दुकाने व घरं मालामाल केली, पण शेतकऱ्यांच्या मालाला आजतागायत योग्य भाव मिळवून देऊ शकले नाहीत. हे नेते आपल्या महाराष्ट्राच्या मातीत ताठ ...

पुन्हाचा अन् उद्याचा प्रपंच करणारे शासनाचे ‘जावई’

पुन्हाचा अन् उद्याचा प्रपंच करणारे शासनाचे ‘जावई’ महाराष्ट्र हा इतर राज्यांच्या बाबतीमध्ये सहनशिल राज्य आहे . त्या राज्यामध्ये शासनाचे सर्व शासकिय विभाग विचारात घेता ग्रामपंचायत कार्यालय ते मंत्रालय हा प्रवास जनसामान्यांच्या कामामध्ये पुन्हाचा अन् उदयाचा प्रपंच करणाऱ्या शासनाच्या जावयांमुळे सर्वांनी अनुभवलेला असेलच . यातून कोणताही घटक वगळा जात नाही . नागरीकांनी त्यांच्या पायऱ्या झिजवणे , शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत त्यांचे खिसे गरम करणे , त्यांच्या मनमानी कारभाला बळी पडणे , अरेरावी , तुच्छ वागणूक , परिसर व कार्यालय अस्वच्छ अशा विविध गोष्टींनी वेढलेले कार्यालय म्हणजे शासकिय कार्यालय . त्यामध्ये काम करणारे शासनाचे जावई . याच शासनाच्या जावयांकडे एखादे काम घेऊन जा , गेल्याबरोबर त्यांच्या त्या कपाळावरील अठ्ठया पाहून काम न होण्याची संकेत मिळतात , त्यांची ती किडणी मागीतल्यासारखी नजर भुकेल्या वाघासारखी वाटते , दिवसातून चार वेळा कार्यालीयन कामकाज सोडून ऑफीसात कमी व चहाच्या टपरीवर दिसणारी...